शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कुपोषण नियंत्रणासाठी व्हीसीडीसी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:48 IST

दिशा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कर्जत : रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूर, महाड, पाली, सुधागड, पनवेल या आदिवासी तसेच निमशहरी तालुक्यात वाढलेल्या कुपोषणाच्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यात नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत डीपीसीमधून निधी उपलब्ध करून सर्व जिल्ह्यात व्हीसीडीसी व तालुका स्तरावर सीटीसी सुरू करण्याची मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड, दिशा केंद्र या सामाजिक संस्थेने व जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

मागच्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन टप्प्यात कुपोषण नियंत्रणासाठी निधी उपलब्ध करून दिला होता, ज्याच्या परिणामातून जिल्ह्यातील कुपोषण काही प्रमाणात कमी होऊ शकले होते, या वर्षी दिशा केंद्र या संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील कुपोषणग्रस्त गाव-वाड्या-वस्त्यांचा सर्व्हे करून वास्तव समोर मांडले होते. कर्जत तालुक्यात सहा महिन्यांसाठी अनेक आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतर करतात. स्थलांतरित ठिकाणी मुलांना, गरोदर, स्तनदा मातांना आरोग्य व पोषण सेवा मिळत नाही, ही सर्व कुटुंबे एप्रिल, मे, जून महिन्यांत घरी परतात. परिणामी, या महिन्यात कुपोषित मुलांच्या संख्येत कमालीची वाढ होते. जून महिन्यात पावसाचे व दूषित पाणी पिल्यामुळेही अनेक मुले आजारी पडतात. या सर्व बाबींची गंभीरता लक्षात घेऊन दिशा केंद्र या सामाजिक संस्थेने ६ जानेवारी २०१८ व २ फेबु्रवारी २०१८ रोजी निवेदन देऊन जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने कुपोषण निर्मूलन कृती कार्यक्रम राबविण्याची विनंती केली होती. आता कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी तसेच दिशा केंद्र व जिल्हापरिषदेच्या महिला बालविकास विभागाने निवेदन देत जिल्ह्यात व्हीसीडीसी व सीटीसी सुरू करण्याची मागणी केली आहे.

६४ मुले तीव्र कु पोषितएप्रिल महिन्यात जिल्ह्यामध्ये ६४ मुले तीव्र कुपोषित श्रेणीमध्ये तर ६१७ मुले ही मध्यम कुपोषित श्रेणीत आढळून आली आहेत. या सर्व मुलांसाठी व्हीसीडीसी, सीटीसी सुरू केली तर फायदा होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Raigadरायगड