शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ई-रिक्षा सुरू करा, पालक बसणार उपोषणाला; लहान मुलांची पायपीट, माथेरानकर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 06:49 IST

पायलट प्रकल्पानंतर सहा महिने झाले ई रिक्षा सुरू होत नाहीत.

कर्जत : पायलट प्रकल्पानंतर सहा महिने झाले ई रिक्षा सुरू होत नाहीत. त्यामुळे माथेरानकरांत संताप असून पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्याची पायपीट थांबत नसल्याने त्यांनी  आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी संनियंत्रण समितीने अहवाल न्यायालयात सादर केला नाहीतर मी स्वत: निर्णय घेऊन ई रिक्षा सुरू करेल, असे आश्वासित केले होते. मात्र, तरीही ही सेवा सुरू झालेली नाही. त्या जिल्हाधिकारी हे सनियंत्रण समितीत मानद सचिव आहेत. त्यामुळे आता पालकांनी त्यांनाच निवेदन दिले असून १२ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये वाहतूक हा विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, माथेरानला तो डावलला जातो.  सर्वोच्च न्यायालयाने १२ मे २०२२ रोजी माथेरानला ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले. तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टदेखील यशस्वी राबविला.  १२ मेच्या आदेशात स्पष्ट केले होते की, पायलट प्रोजेक्टनंतर ई रिक्षा कशा पद्धतीने सुरू करणार याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी. ई रिक्षा बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत, असे असताना ही सेवा बंद आहे. 

पालकांचा आंदोलनाचा निर्धार  ई - रिक्षा तत्काळ सुरू करण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालक चंद्रकांत सुतार, केतन रामाने, आदेश घाग, संतोष पवार, आदित्य भिलारे, नंदू चव्हाण, शैलेश भोसले, हरिभाऊ लबडे ही मंगळवार, १२ सप्टेंबरपासून श्री राम चौक येथे संविधानिक मार्गाने आमरण उपोषणाला बसणार आहेत.

टॅग्स :Karjatकर्जतMatheranमाथेरान