शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वृक्षांच्या जागी उभे राहिले विजेचे खांब, वृक्षलागवड होणार कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 06:13 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडली झाडे

सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू झाल्यानंतर रस्त्यालगत असलेले महाकाय वृक्ष तोडण्यात आले. मात्र, तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या जागी नवे वृक्ष लावण्याच्या जागी संबंधित ठेकेदार कंपनीने विजेचे खांब उभे केल्याने आता वृक्षलागवड होणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महावितरण कंपनीनेही या विजेच्या खांबाखाली वृक्षलागवड होऊ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मुंबई-गोवामहामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली. यातून कोकणातून जाणारा हा मार्ग चौपदरीकरण करण्यास मंजुरी मिळाली आणि कोकणातील या महामार्गावरील वृक्षांची सावली कायमची नष्ट झाली. महाकाय वृक्ष या चौपदरीकरणात बाधित झाले. हजारो वृक्ष या कामात तोडण्यात आले.

शासनाच्या नियमानुसार वृक्षतोड केल्यानंतर नवीन वृक्ष लावण्यास प्रत्येक जण बांधील राहतो. याप्रमाणे महामार्गावर ज्या ठेकेदार कंपनी काम करत आहेत, त्या कंपनी वृक्षलागवड करण्यास बांधील आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सहापदरी मंजूर झाले. मात्र, निधीअभावी हे काम चौपदरीकरणावर आले, यामुळे शेतकऱ्यांकडून सहापदरीसाठी भू-संपादन केले आहे. या सहापदरीमधून रस्त्यालगत असलेले वृक्ष तोडण्यात आले, याकरिता वनविभागाकडून परवानगी दिली असली तरी अद्याप या वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आलेले नाही.

पनवेलपासून थेट तळकोकणात हा मार्ग जात असून कोकणातील वन्य संपत्ती यामध्ये बाधित झाली आहे. पनवेल ते तळकोकणात जाणाऱ्या या मार्गावर रस्त्यालगत गेल्या अनेक वर्षांचे जुने वृक्ष होते. हे वृक्ष यामुळे बाधित झाले. नव्याने वृक्षलागवड झाल्यास हे वृक्ष डेरेदार होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जाणार आहे. मे महिना सुरू झाला असून काही दिवसांतच मान्सूनचे आगमन होईल. मान्सूनच्या सुरुवातीलाच वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे. मात्र, महामार्ग ठेकेदाराने वृक्षलागवड करण्याच्या जागी विजेचे खांब उभे केले आहेत. महामार्गालगत असलेल्या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी हे खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, ज्या जागेवर वृक्षलागवड होणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत, त्यामुळे आता वृक्षलागवड कुठे करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे नियोजन दिसून येत नाही.

कोकणातील वनसंपदा अडचणीत येण्याची शक्यताएकीकडे वनविभाग वृक्षतोड करण्यास सर्वसामान्य नागरिकास आडकाठी आणतोच, शिवाय वृक्षलागवड करण्यास महिन्याचा कालावधीदेखील होतो. मात्र, या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवल्याने दिसून येत आहे.

भविष्यात या ठिकाणी वृक्षलागवड केल्यास या विजेच्या तारांना अडथळा येणार आहे. यामुळे या विजेच्या खांबाजवळ वृक्षलागवड करू दिली जाणार नाही, अशी माहिती महावितरण कार्यालयाने दिली आहे. चौपदरीकरणाच्या लगत वृक्षलागवड केल्यास पुन्हा सहापदरीच्या कामा वेळी वृक्षतोड केली जाण्याची शक्यता आहे, यामुळे कोकणातील वृक्षसंपदा यापुढेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महामार्ग चौपदरीकरण होत असले तरी सहापदरीसाठी भूसंपादन केले आहे, यामुळे उर्वरित ३० मीटरमध्ये वृक्षलागवड केले जाईल. - प्रकाश गायकवाड, महामार्ग अधिकारी

वृक्षलागवड करण्याबाबत ठेकेदाराकडून लिखित स्वरूपात करारपत्र लिहून घेतले जाते. शिवाय, या प्रकल्पाशी वृक्षलागवडीबाबत वनविभागाचा थेट संबंध येत नाही. - प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल, महाड

महामार्गालगत ज्या ठिकाणी वृक्षलागवड करणे अपेक्षित आहे, त्या ठिकाणी वीज पोल उभे केले आहेत, यामुळे भविष्यात या ठिकाणी वृक्षांचा अडथळा होणार आहे. विजेची समस्या यामुळे निर्माण होणार असल्याने या ठिकाणी आता वृक्षलागवड करू दिली जाणार नाही. - राजेश खोराटे, कनिष्ठ अभियंता, महावितरण

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग