शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

श्रीवर्धनमध्ये शेतीनुकसानाची दुग्ध व्यवसायाला झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 02:41 IST

: श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम गाव, वाड्या परिसरातील यंदा अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

- गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम गाव, वाड्या परिसरातील यंदा अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी अनेक पिकातून जनावरांना उर्वरित चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे परंपरेनुसार शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायच केला जात असे त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आर्थिक प्रश्नही सुटत होते. मात्र, यावेळी जनावरांना चारा मुबलक मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांना व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच माळरानावरील गवत पेटवून दिल्याने चाºयाचा तूटवडा निर्माण झाला आहे.तालुक्यात मागील काळात चाºयाचा प्रश्न उद्भवत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती या मुख्य व्यवसायासोबतच दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले. याच कालावधीत दुधाला योग्य दर मिळाल्याने जोड व्यवसायावर परिसरातील शेतकरी सधन झाले. अल्पावधीतच हा व्यवसाय भरभराटीस येऊन अनेक शेतकºयांनी प्रगती साधली व दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. आज चित्र पालटले असून, दुधाचे भाव निम्म्यावर, तर पशुखाद्याचे भाव दुपटीने वाढल्याने दुग्धव्यवसायाकडे शेतकºयांनी पाठ फिरवल्याने हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. जनावरांच्या चाºयावर होणारा खर्च व दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे समसमान असल्याने शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नाही. जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वृद्धीसाठी प्रयत्न झाल्याचे दुर्मिळच मात्र धवलक्रांतीचे स्वप्न आजही नजरेच्या टप्प्यात नाही.एकीकडे यावेळी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीतून अखेरीस जनावरांना मिळणारा पेंढा हा चारा मिळाला नाही. याशिवाय माळरानावरील गवत वानवा लावून पेटून देण्यात येत असल्याने उन्हाळी चाºयाचा प्रश्न निर्माण होत आहे. हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाºयावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत असल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे. अशा व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकºयांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.तोट्याची कारणेशासनाची उदासीनता, महत्त्वाच्या योजना बंद, अत्याधुनिक सामग्री व तंत्रज्ञाचा अभाव हे आहेत. ठोस उपयायोजना, तसेच धोरणात्मक बदल अपेक्षित, आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा निर्माण करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच नवीन योजना सुरू करणे सहकारी संस्थांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.अतिवृष्टीमुळे यावेळी शेतकºयांचे मोठे नुकसान होऊन दुग्धव्यवसायावर परिणाम झाले आहे. यामुळेच पशुविभागाकडून मागील पंधरवड्यात जनावरांना चाºयासाठी मका बियाणे वाटप करण्यात आले आहे. पुढे शेतकºयांसाठी पंचायत समिती कृषी विभाग श्रीवर्धन मार्फत भाजीपाला बियाणेचे वाटप करण्यात येणार आहे.- बी. एल. कांबळे, कृषी अधिकारी,पंचायत समिती श्रीवर्धनजनावरांसाठी पोषक खाद्य नाहीउदासीनता हा मुख्य अडसर तालुक्यातील शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. बºयाच शेतकºयांना शासनाच्या योजनांची अद्याप नावेही माहित नाहीत. श्रीवर्धनसह दक्षिण रायगडमध्ये सध्या सुरती, मुरा, पंढरपुरी जातीच्या म्हशी दिसतात, तसेच जर्सी, एचएफ जातीच्या गायीसुद्धा आहेत.या जनावरांसाठी येथे पोषक खाद्याची उपलब्धता होत नाही. या म्हशी किंवा गायी एकावेळी ५ ते ७ लिटर दूध देतात. त्यांचे व्यवस्थित संगोपन झाल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकते.तालुक्यात पाण्याची ही मुबलकता आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्याचा दुग्ध व्यवसायास मोठा हातभार लागू शकतो. शेतकºयांना याबद्दल सखोल मार्गदर्शन होताना दिसत नाही. असे झाल्यास नक्कीच एक दिवस धवलक्रांती सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. यात शासन आणि शेतकºयांत उदासिनता प्रकर्षाने जाणवते.

टॅग्स :Raigadरायगड