शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रकाशासाठी डोंगरदऱ्यांत राबताहेत श्रीसदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्युत खांब उभे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 00:42 IST

श्रीवर्धन तालुक्यासह अन्य तालुक्यांत निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले तर अनेक विद्युत खांब जमीनदोस्त केले. ३ जूनपासून आजपर्यंत प्रशासन नियोजन करीत आहे.

म्हसळा : गेल्या ३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरेश्वर या ठिकाणचे नैसर्गिक, खाजगी मालमत्ता त्याचप्रमाणे झाडे, घरे यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच आजपर्यंत अनेक गावे अंधारात आहेत. विजेचे अनेक खांब पडले असून ते उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामास विलंब होऊ नये म्हणून मानवता हाच धर्म आणि मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो श्रीसदस्य या आपत्तीत पुढे सरसावत डोंगरदरीतून विद्युत खांब उभे करीत आहेत.श्रीवर्धन तालुक्यासह अन्य तालुक्यांत निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले तर अनेक विद्युत खांब जमीनदोस्त केले. ३ जूनपासून आजपर्यंत प्रशासन नियोजन करीत आहे. व्यापकता मोठी असल्याने त्या ठिकाणी प्रशासनदेखील हतबल होत आहे. त्या ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र येऊन गेल्या आठ दिवसांपासून प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, दिघी, गाळसुरे, साखरी, निगडी, सायगाव, मारळ, कुरवडे, मारळ बौद्धवाडी, कुरवडे बौद्धवाडी, काळीजे या ठिकाणी वीज खांब उभे करण्यास २०० हून अधिक सदस्य काम करीत आहेत. या वेळी एसटी विद्युत वाहिनीचे आतापर्यंत ४४ खांब, एलटी विद्युत वाहिनीचे ७४ खांब बसवून त्यांची विद्युत वायर जोडणीदेखील केली आहे. हे काम करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाच्या सरींत काम करीत आहेत.ग्रामस्थांनी मानले आभारआजवर प्रतिष्ठानने वेळावेळी प्रशासनास मदत केली आहे. विविध उपक्रम राबवत शासनाचे काम हलके केले आहे. प्रतिष्ठानचे कार्य पाहून सर्वच ग्रामस्थांनी हातभार लावत प्रतिष्ठानचे हात जोडून आभार मानले आहेत. हे काम सुरू होताच त्या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांनी भेट घेत प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी झाले.

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज