शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फणसाडमध्ये जाळ रेषा काढण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:57 IST

५४ किलोमीटरचा परिसर; वनसंपदा, प्राण्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना

मुरुड : तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात सुमारे ५४ किलोमीटर परिसरात व्याप्त असे फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. मुंबईपासून१६० किलोमीटर अंतरावर पनवेल- पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. नवाब काळापासून हे शिकार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. येथील वनसंपदेचे, प्राण्यांचे रक्षण होण्यासाठी जाळ रेषा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.विस्तीर्ण अशा या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते. औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. पक्षाच्या १६४ प्रजाती या ठिकाणी आढळतात. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे.निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाडे येथे मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात एकूण ३१ अभयारण्ये असून सर्वात दुर्मीळ असा शेकरू हा प्राणी आढळून येतो. उंच अशा निलगिरीच्या झाडावर या अभयारण्यात ३२ घरटी आढळून आलेली आहेत.निसर्गरम्य अशा या फणसाड अभयारण्यात सध्या त्यांच्या हद्दीत जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग आलेला आहे.वणव्यांपासून बचावासाठी उपाययोजनावातावरण बदलते असून केव्हाही अशा वातावरणात वणवे लागण्याची शक्यता असते. वन्यजीवांकडून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचे काम सुरु केले आहे. जेणेकरून जंगल सुरक्षित राहावे व त्यामधील प्राणी, पशुपक्षी व वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी जाळ रेषा खूप उपयुक्त आहे.जाळ रेषा काढणे म्हणजेच फणसाड अभयारण्य क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असणारा भूभाग, येथे सुकलेले गवत व पालापाचोळा असतो. रस्त्यावरून जाणाºया व येणाºया एखाद्या सिगरेट पिणाºया व्यक्तीने चुकून जर का सिगरेट अथवा माचिस काडी टाकल्यास सुके गवत तातडीने पेट घेऊन ही आग जंगलभागाच्या चहूबाजूला पकडली जाऊ शकते. यासाठी रस्त्याकडेला असणाºया भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक्या गवताला जाळले जाते ज्यामुळे जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते.जळीत रेषा काढण्याचे काम फणसाड अभयारण्यात दरवर्षी केले जाते. वनमजूर वनरक्षक व वनपाल हे जळीत रेषा काढण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. अभयारण्यातील वन्यजीव सुरक्षित रहावे व जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी जळीत रेषा काढणे खूप आवश्यक आहे. ५४ किलोमीटर परिक्षेत्रातील काही भागात जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे.- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी