शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फणसाडमध्ये जाळ रेषा काढण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:57 IST

५४ किलोमीटरचा परिसर; वनसंपदा, प्राण्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना

मुरुड : तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात सुमारे ५४ किलोमीटर परिसरात व्याप्त असे फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. मुंबईपासून१६० किलोमीटर अंतरावर पनवेल- पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. नवाब काळापासून हे शिकार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. येथील वनसंपदेचे, प्राण्यांचे रक्षण होण्यासाठी जाळ रेषा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.विस्तीर्ण अशा या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते. औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. पक्षाच्या १६४ प्रजाती या ठिकाणी आढळतात. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे.निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाडे येथे मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात एकूण ३१ अभयारण्ये असून सर्वात दुर्मीळ असा शेकरू हा प्राणी आढळून येतो. उंच अशा निलगिरीच्या झाडावर या अभयारण्यात ३२ घरटी आढळून आलेली आहेत.निसर्गरम्य अशा या फणसाड अभयारण्यात सध्या त्यांच्या हद्दीत जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग आलेला आहे.वणव्यांपासून बचावासाठी उपाययोजनावातावरण बदलते असून केव्हाही अशा वातावरणात वणवे लागण्याची शक्यता असते. वन्यजीवांकडून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचे काम सुरु केले आहे. जेणेकरून जंगल सुरक्षित राहावे व त्यामधील प्राणी, पशुपक्षी व वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी जाळ रेषा खूप उपयुक्त आहे.जाळ रेषा काढणे म्हणजेच फणसाड अभयारण्य क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असणारा भूभाग, येथे सुकलेले गवत व पालापाचोळा असतो. रस्त्यावरून जाणाºया व येणाºया एखाद्या सिगरेट पिणाºया व्यक्तीने चुकून जर का सिगरेट अथवा माचिस काडी टाकल्यास सुके गवत तातडीने पेट घेऊन ही आग जंगलभागाच्या चहूबाजूला पकडली जाऊ शकते. यासाठी रस्त्याकडेला असणाºया भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक्या गवताला जाळले जाते ज्यामुळे जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते.जळीत रेषा काढण्याचे काम फणसाड अभयारण्यात दरवर्षी केले जाते. वनमजूर वनरक्षक व वनपाल हे जळीत रेषा काढण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. अभयारण्यातील वन्यजीव सुरक्षित रहावे व जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी जळीत रेषा काढणे खूप आवश्यक आहे. ५४ किलोमीटर परिक्षेत्रातील काही भागात जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे.- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी