शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तीस हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:15 IST

खासगीकरणाचे पहिले पाऊल; केंद्र सरकारचे लेखी पत्रक जारी 

- मधूकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : केंद्र सरकारने बंदराच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल टाकले असून, देशातील ११ सरकारी बंदरांतील सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना (SVRS) लागू करण्यात आली आहे. यामध्ये जेएनपीटीच्या १,४७३ कामगारांचाही समावेश आहे. यासाठी केंद्र सरकारचे सचिव राजीव नयन यांनी १२ नोव्हेंबर, २०२० रोजी देशातील सरकारी ११ बंदरांसाठी लेखी पत्रच जारी केले आहे.

बंदरात कायमस्वरूपी १० वर्षे आणि ४० वर्षे वयोमर्यादेपासून काम करणारे कामगारच या योजनेसाठी पात्र ठरविले आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगारांच्या वारसांना नोकरी देणे बंदरांना बंधनकारक नाही. विशेष स्वेच्छानिवृत्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी आहे. त्यामुळे ती घेणाऱ्या कामगारांनी तीन महिने आधी नोटीस देणे बंधनकारक केले आहे. तसेच खासगी बंदरे अथवा कंपन्या वगळता एसव्हीआरएस घेणाऱ्या कामगारांना सरकारी बंदरात नोकरी मिळणार नाही. १० वर्षे, ३० वर्षांपर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत.या ऐच्छिक एसव्हीआरएसचा बंदरात ३० वर्षे काम केलेल्या कामगारांना अधिक आर्थिक फायदा होणार आहे. मात्र, ३० वर्षांहून कमी काम केलेल्या कामगारांसाठी एसव्हीआरएस आर्थिक नुकसानीची ठरणार असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.

देशातील ११ बंदरामधील कर्मचाऱ्यांचा समावेश देशभरात सरकारच्या अखत्यारित ११ बंदरे आहेत. या ११ बंदरातील कोलकाता- ३,७७२, पॅरादीप- ७५८, विशाखापट्टणम- ३,१५०, चेन्नई- ३ ९५३, व्ही.ओ. चिंदमबरन- ६९१, कोचीन- १,३९४, न्यू मंगलोर- ६०२, मोरमुगाव- १,५१३, मुंबई- ६,४३०, जेएनपीटी- १,४७३, दीनदयाळ- २,२०३ अशा ११ बंदरांत एकूण २५,९३९ कामगार काम करीत आहेत. देशभरातील या ११ बंदरांत काम करणाऱ्या सुमारे ३० हजार बंदर कामगारांसाठी केंद्र सरकारने विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीCentral Governmentकेंद्र सरकार