शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नागोठणे रेल्वे स्थानकाला पुन्हा विशेष गाड्यांचा ठेंगा

By admin | Updated: August 22, 2015 21:43 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर

नागोठणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून चार सप्टेंबरपासून पनवेल ते चिपळूण अशी विशेष गाडी चालू करण्यात येत आहे. ही गाडी पनवेलहून सुटल्यानंतर थेट रोहे स्थानकावर थांबणार असल्याने पेण आणि नागोठणे यातून वगळल्याबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधित गाडीला नागोठणेत थांबा मिळण्यासाठी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. नागोठणे स्थानक मध्य रेल्वेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे गणले जाते. मालगाडीद्वारे दर महिन्याला लाखो टन मालाची चढ-उतार या स्थानकातून केली जात असल्याने रेल्वे प्रशासनाला त्यातून करोडो रु पयांचे उत्पन्न मिळत असते. या स्थानकातून दररोज पंचवीस ते तीस प्रवासी तसेच जलद गाड्या दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांकडे जात असल्या तरी यातील एकही गाडी स्थानकात थांबत नाही. रोहा-दिवा, दादर-रत्नागिरी, सावंतवाडी - दिवा, दिवा - रोहा, दिवा - सावंतवाडी आणि रत्नागिरी - दादर या आठच प्रवासी गाड्या येथे थांबत असल्याने परराज्यातून आलेल्या प्रवाशांना पनवेल, रोहे किंवा माणगाव या स्थानकात उतरून नागोठणेत यावे लागत असते. दर महिन्याला साधारणत: पंधराशे प्रवाशांना हा द्राविडी प्राणायाम करायची वेळ येत असते.नियमित नोकरीधंदा तसेच शिक्षणासाठी दररोज पनवेल, ठाणे, मुंबईकडे जाणारे पासधारक ही खंत बोलून दाखवत असले, तरी रेल्वेने पनवेल - चिपळूण गाडीला येथे थांबा न देता पुन्हा एकदा नागोठणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाली, खांब, आमडोशी, सांबरी, कोलेटी, रिलायन्स निवासी संकुल आदी भागातील अनेक गावांमधील शेकडो प्रवासी जा - ये करण्यासाठी नागोठणे स्थानकाचाच वापर करीत असतात. ही विशेष गाडी या स्थानकात थांबविली तर शेकडो प्रवाशांना त्याचा लाभ होणार असल्याने प्रवासीवर्गाचे म्हणणे आहे. (वार्ताहर)- १९८६ या मार्गावर वाहतूक चालू झाल्यानंतर एकतीस वर्षे उलटूनही नागोठणेतील प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असले, तरी आम्ही कितीही बोंबा मारूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. मात्र, कोणताही स्थानिक नेता आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करतात.