शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी विशेष कॅम्प - अजित गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:27 IST

गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे.

अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्जतमधील सरकारी रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील ३० बालकांना अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणले जाणार आहे. कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी हा विशेष कॅम्प अलिबागच्या सरकारी रु ग्णालयात घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.याआधीच एका कुपोषित बालकावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कायस्वरूपी बालरोग तज्ज्ञ देण्याची मागणी सरकार दरबारी केली असल्याचेही डॉ.गवळी यांनी स्पष्ट केले.सकाळपासूनच कॅम्पला सुरु वात होणार आहे. कुपोषित बालकांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सरकार कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजनांसाठी कोट्यवधी रु पये खर्च करीत असताना देखील कुपोषित बालके आढळण्याचे प्रमाण थांबलेले नाही. त्यामुळे प्रशासन आणि सरकार यामध्ये कमी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.आठ दिवसांपूर्वी कुपोषणाने एका बालकाचा मृत्यू झाल्याची बातमी काही स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र ते बालक कुपोषणाने मरण पावले नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता. त्यातच एका कुपोषित बालकाला २९ आॅक्टोबरला जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कुपोषित बालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कर्जत तालुक्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे.अलिबाग येथे होणाºया कॅम्पसाठी कर्जत तालुक्यातून सुमारे ३० बालकांना उपचारासाठी आणले जाणार आहे.तेथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाणार आहे.किमान १४ दिवसांकरिता त्यांना उपचार, पोषण आहार द्यावा लागतो.मात्र आदिवासी समाजातील व्यक्ती पूर्ण वेळ उपचारासाठी थांबत नसल्याची खंत डॉ.गवळी यांनी व्यक्त केली.एक वर्षाच्या बालकाला किमान ९००-१००० कॅलरी रोजचा आहार मिळणे आवश्यक आहे. त्यांना तो मिळत नसल्याने बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकली जातात. बालकांचा पोषण आहार महत्त्वपूर्ण असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. विनायक पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड