शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

भाजीपाल्याच्या दराचा आलेख चढताच; रायगडमध्ये मागणी पुरवठ्यामध्ये तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:27 IST

शेतकऱ्यांकडून कमी दराने उचल, बाजारात चढ्या दराने विक्री, गृहिणी नाराज

- आविष्कार देसाई ।

रायगड : कोरोनामुळे सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. परिणामी, अत्यावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हाबंदीमुळे वाहनांची वाहतूक रोडावल्याने भाजीपाल्याच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची उचल करून, तोच शेतमाल किरकोळ बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. त्याचा विपरित परिणाम हा गृहिणींच्या आर्थिक बजेटवर होत आहे.

मार्च महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे सर्वत्रच व्यवहार ठप्प झाले होते. कालांतराने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, त्यामध्ये शिथिलता आणत, व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले, तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. याची दखल घेत, रायगड जिल्ह्यामध्ये १६ ते २६ जुलै, २०२० या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन करण्याआधी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी दिला होता. याच कालावधीत भाज्यांचे दर चांगलचे वधारले.

लॉकडाऊन पुन्हा वाढण्याच्या भीतीने नागरिकांनी दोन आठवडे पुरेल, एवढा साठा करण्यावर भर दिल्याने भाजी विक्रे त्यांचेही चांगलेच फावले. त्यांनी लगेचच भाजीपाला आणि फळांच्या किमती आव्वाच्या सव्वा वाढवल्या. मात्र, जीवनावश्यक वस्तू घेणे आवश्यक असल्याने, नागरिकांनी मिळेल त्या किमतीला वस्तू खरेदी केल्या. दोन महिन्यांपूर्वी आणि आताच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते.

मेथीची भाजी खातेय भाव

मेथीची भाजी आधी २० रु पयांना एक जुडी बाजारात मिळत होती. तिची किंमत आता ५०-६० रु पये जुडी झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांमध्ये सध्या मेथीची भाजी चांगलीच भाव खात आहे.

तिखट मिरचीचा झटकाच न्यारा

बाजारात तिखट मिरचीची किंमत ९० रुपये किलो होती. सध्या ती १३० रु पये किलोने विकली जात आहे. त्याचप्रमाणे, आधी कोथिंबिरीची जुडी २५ रु पयांना मिळायची, ती आता ६० रुपयांना मिळत आहे. आमटी आणि वरणाला फोडणी देण्यासाठी मिरची-कोथिंबिरीची नितांत गरज असल्याने गृहिणी त्यासाठी मागेल ती किंमत मोजत असल्याचे दिसते.

कोथिंबीरही ठरतेय वरचढ

बाजारात सध्या गावठी कोथिंबिरीला मोठी मागणी आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे शेतात उत्पादित केलेला माल लॉकडाऊनमुळे बाजारात विकला जाणार नाही. मात्र, कोथिंबीर बाजारात वरचढ ठरत आहे.

या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढले

४मार्च महिन्यापासून जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. याच कालावधीमध्ये शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत होते. त्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवलाच नाही. त्यामुळे बाजारात आवक चांगलीच घटली. ४ लॉकडाऊनमुळे विविध वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हाबंदीमुळे भाजीपाल्याची ने-आण करणाºया वाहनांचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत नव्हता. शेतकºयांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी काही व्यापारी करत आहेत. बाजारात तुमचा माल विकला जाणार नाही, असे सांगत आहेत. तर किरकोळ व्यापारी हे तोच माल चढ्या दराने विकत आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेण्यास घाबरत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधन आले. अचानक मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला, त्यामुळे भाजीपाला आणि फळांच्या किमतीमध्ये वाढ झाली. - राज ढवळे भाजीविक्रेताकोरोनामुळे सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार कधी बंद होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यामुळे खरेदी करावी लागत आहे, परंतु अचानक वाढणाºया किमतीवर आणि साठा करणाºयांवर सरकार, प्रशासनाने निर्बंध लावले पाहिजेत. - अनंत पवार, ग्राहक

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या