शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

भाजीपाल्याच्या दराचा आलेख चढताच; रायगडमध्ये मागणी पुरवठ्यामध्ये तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:27 IST

शेतकऱ्यांकडून कमी दराने उचल, बाजारात चढ्या दराने विक्री, गृहिणी नाराज

- आविष्कार देसाई ।

रायगड : कोरोनामुळे सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. परिणामी, अत्यावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हाबंदीमुळे वाहनांची वाहतूक रोडावल्याने भाजीपाल्याच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची उचल करून, तोच शेतमाल किरकोळ बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. त्याचा विपरित परिणाम हा गृहिणींच्या आर्थिक बजेटवर होत आहे.

मार्च महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे सर्वत्रच व्यवहार ठप्प झाले होते. कालांतराने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, त्यामध्ये शिथिलता आणत, व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले, तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. याची दखल घेत, रायगड जिल्ह्यामध्ये १६ ते २६ जुलै, २०२० या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन करण्याआधी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी दिला होता. याच कालावधीत भाज्यांचे दर चांगलचे वधारले.

लॉकडाऊन पुन्हा वाढण्याच्या भीतीने नागरिकांनी दोन आठवडे पुरेल, एवढा साठा करण्यावर भर दिल्याने भाजी विक्रे त्यांचेही चांगलेच फावले. त्यांनी लगेचच भाजीपाला आणि फळांच्या किमती आव्वाच्या सव्वा वाढवल्या. मात्र, जीवनावश्यक वस्तू घेणे आवश्यक असल्याने, नागरिकांनी मिळेल त्या किमतीला वस्तू खरेदी केल्या. दोन महिन्यांपूर्वी आणि आताच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते.

मेथीची भाजी खातेय भाव

मेथीची भाजी आधी २० रु पयांना एक जुडी बाजारात मिळत होती. तिची किंमत आता ५०-६० रु पये जुडी झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांमध्ये सध्या मेथीची भाजी चांगलीच भाव खात आहे.

तिखट मिरचीचा झटकाच न्यारा

बाजारात तिखट मिरचीची किंमत ९० रुपये किलो होती. सध्या ती १३० रु पये किलोने विकली जात आहे. त्याचप्रमाणे, आधी कोथिंबिरीची जुडी २५ रु पयांना मिळायची, ती आता ६० रुपयांना मिळत आहे. आमटी आणि वरणाला फोडणी देण्यासाठी मिरची-कोथिंबिरीची नितांत गरज असल्याने गृहिणी त्यासाठी मागेल ती किंमत मोजत असल्याचे दिसते.

कोथिंबीरही ठरतेय वरचढ

बाजारात सध्या गावठी कोथिंबिरीला मोठी मागणी आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे शेतात उत्पादित केलेला माल लॉकडाऊनमुळे बाजारात विकला जाणार नाही. मात्र, कोथिंबीर बाजारात वरचढ ठरत आहे.

या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढले

४मार्च महिन्यापासून जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. याच कालावधीमध्ये शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत होते. त्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवलाच नाही. त्यामुळे बाजारात आवक चांगलीच घटली. ४ लॉकडाऊनमुळे विविध वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हाबंदीमुळे भाजीपाल्याची ने-आण करणाºया वाहनांचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत नव्हता. शेतकºयांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी काही व्यापारी करत आहेत. बाजारात तुमचा माल विकला जाणार नाही, असे सांगत आहेत. तर किरकोळ व्यापारी हे तोच माल चढ्या दराने विकत आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेण्यास घाबरत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधन आले. अचानक मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला, त्यामुळे भाजीपाला आणि फळांच्या किमतीमध्ये वाढ झाली. - राज ढवळे भाजीविक्रेताकोरोनामुळे सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार कधी बंद होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यामुळे खरेदी करावी लागत आहे, परंतु अचानक वाढणाºया किमतीवर आणि साठा करणाºयांवर सरकार, प्रशासनाने निर्बंध लावले पाहिजेत. - अनंत पवार, ग्राहक

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या