शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आपद्ग्रस्तांसाठी कष्ट घेतल्याचे मिळाले समाधान; महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 01:43 IST

गेल्या वर्षी १ आॅगस्टला नाइट राउंडला असताना वायरलेस सेटवर मेसेज मिळाला, ‘गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळील पूल कोसळला...

- जयंत धुळपअलिबाग : गेल्या वर्षी १ आॅगस्टला नाइट राउंडला असताना वायरलेस सेटवर मेसेज मिळाला, ‘गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळील पूल कोसळला... काही गाड्या सावित्री नदीच्या पुरात वाहून गेल्यात...’ तत्काळ पुलाजवळ पोहोचलो, अर्धा पूल तुटून नदीत कोसळल्याचे दिसले... त्याच क्षणाला पत्नीचा फोन आला, ‘बाबांची तब्येत बरी नाही, त्यांना कल्याणला हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल केलेय, तुम्ही ताबडतोब या...’ तेव्हा मनाची मोठी घालमेल झाली... त्या वेळी मी केवळ येतो सांगितले आणि समोर आलेल्या प्रसंगाला प्रथम सामोरे जाण्याचा निर्णय घेतला... अशा अंगावर काटा आणणाऱ्या स्मृती महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितल्या. या दुर्घटनेत कर्तव्यावर असताना वडिलांची अखेरची भेट झाली नाही याचे शल्य मनात होते. पण त्याच वेळी जे काम मी करीत होतो त्याचे समाधान माझ्या वडिलांना मी अखेरच्या क्षणी देऊ शकलो याचे मात्र समाधान वाटते, असे ते म्हणाले.ते सांगतात, पत्नीचा फोन ठेवला आणि दुसरा तिसरा काहीही विचार न करता... प्रथम वाहतूक थांबविली, शक्य ती आपत्ती निवारणात्मक उपाययोजना अंमलात आणली. भीषण अंधार... धोधो पाऊस... किती गाड्या वाहून गेल्या काही अंदाज नाही... सारे वातावरण भीतिदायक होते. त्यानंतर रातोरात जिल्हा, राज्य आणि केंद्रीय स्तरावरील सारी यंत्रणा सक्रिय कार्यरतझाली.रत्नागिरी जिल्ह्यातून निघालेल्या दोन एसटी बसेस मुंबईत अपेक्षित वेळी पोहोचल्या नव्हत्या, त्या पूल पडला त्या वेळीच येथे असण्याची दाट शक्यता होती आणि अखेर तीच शक्यता खरी ठरली. त्यातच एक तवेरा गाडीदेखील वाहून गेल्याची खातरजमा झाली. रायगडचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि तत्कालीन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले रातोरात घटनास्थळी पोहोचले. सावित्री नदीकिनारी दोन्ही बाजंूनी शोधमोहीम सुरू करण्यात आली. मध्यरात्र सरकून पहाट जशी होऊ लागली तसे आक्रोश करीत सावित्री पुलाजवळ पोहोचणारे रत्नागिरीमधील नातेवाईक, वातावरण अत्यंत गंभीर करून टाकत होते.महाड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांनी आपत्ती निवारणाकरिता सहकार्याचा हात पुढे केला. सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. प्रत्यक्ष घटनेचा प्रथमदर्शी मी असल्याने त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली आणि आपल्या फायबर बोटींच्या माध्यमातून खळाळत वाहणाºया सावित्रीच्या प्रवाहात शोधमोहीम सुरू केली. त्यांना आवश्यक ती सारी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मी त्यांच्या सोबतच होतो, असे सांगून शिंदे काही क्षण थांबले.अखेर वडिलांचे निधन झाले...पुढील चार दिवस शोधमोहिमेत एसटीचे अवशेष सापडले, बानकोटच्या खाडीत मृतदेह सापडले. पण तिकडे बाबांची तब्येत पुन्हा गंभीर झाली. आता तरी तुम्ही या, असा पत्नीचा फोन आला. पण मी गेलो नाही. आणि अखेर ७ आॅगस्ट २०१७ रोजी वडिलांचे निधन झाले. निधन झाले आहे आता तरी निघा, असा पत्नीचा निर्वाणीचा फोन आला.तिला सांगितले, बाबांचे शव रुग्णवाहिकेतून घेऊन गावी (चोपडा-जळगाव) निघा, मी येथून निघतो. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना हा कौटुंबिक प्रसंग सांगितला. त्यांना धक्काच बसला आणि अखेर सावित्रीच्या किनाºयावरून गावी निघालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.वडिलांना माझा अभिमान वाटलापुन्हा पत्नीचा फोन आला, तुम्ही येताय ना, बाबा तुमची आठवण काढताहेत. मी केवळ हो साहेबांशी बोलतो आणि निघतो असे सांगितले आणि फोन ठेवला. पण आपत्तीमधील हे काम अर्धवट सोडून आपण जावे यासाठी माझे मन तयार नव्हते. अखेर दुसºया दिवशी या दुर्घटनेची बातमी पत्नीने पाहिली तेव्हा तिला सारा उलगडा झाला. तिने ती बातमी बाबांना हॉस्पिटलमध्ये वाचून दाखविली आणि पत्नीचा पुन्हा फोन आला, बाबांना तुमचा अभिमान वाटत असल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड