शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

माथेरानच्या चिमुकलीचे पंतप्रधानांना पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 04:30 IST

गावाची ही महत्त्वपूर्ण व्यथा कायमस्वरूपी संपुष्टात यावी, यासाठी चक्क इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमारी कार्तिकी भास्कर शिंदे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे.

माथेरान : माथेरानची मुख्य वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी आजवर इथल्या राजकीय पक्षांच्या अनेकांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे; परंतु त्याकडे शासनाने नेहमीच डोळेझाक केली आहे. गावाची ही महत्त्वपूर्ण व्यथा कायमस्वरूपी संपुष्टात यावी, यासाठी चक्क इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमारी कार्तिकी भास्कर शिंदे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे.कार्तिकी शिंदे ही येथील सेंट झेव्हियर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत आहे. ही शाळा गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. तिथेपर्यंत पायी जाणे त्रासदायक आहे. ऐन पावसाळ्यात तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माथेरान हे अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आल्यामुळेही शासनाच्या जाचक अटींचा मुकाबला ग्रामस्थांना करावा लागत आहे. आमच्या शाळेत जाण्यासाठी पाच वर्षांच्या मुलांना इथल्या दगडामातीच्या रस्त्यातून चालणे म्हणजे अग्निदिव्य आहे. इथे पावसाचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे शासनाने निदान आम्हा शालेय विद्यार्थ्यांना तसेच आबालवृद्ध मंडळींना सोयीस्कर अशी बॅटरीवर चालणारी प्रदूषणमुक्त ई-रिक्षा सुरू करावी. यासाठी पंतप्रधानजी तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, अशा आशयाचे पत्र कार्तिकीने ८ जुलैला पंतप्रधानांना पाठवले आहे. या चिमुकलीच्या पत्राची पंतप्रधान काय दखल घेतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Matheranमाथेरानnewsबातम्या