शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्र हे अक्षय ऊर्जेचा स्रोत

By admin | Updated: February 21, 2017 06:08 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना

नांदगाव/ मुरूड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना असंख्य मावळ्यांसह रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे चरित्र समाजाला आजही अक्षय ऊर्जेचे स्रोत ठरत आहे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास अभ्यासक डॉ. माधव पोतदार यांनी केले.जंजिरा-मुरूड नगरपरिषद व शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवचरित्रावर व्याख्यान देताना पोतदार बोलत होते. पोतदार म्हणाले की, शिवाजीची ओळख तलवार आणि अफझल खानाचा वध इतकी सिमित राहू नये. तर माता, मातृभूमी आणि मातृभाषा या मानदंड सगळ्याने विचार रयतेमध्ये रुजवून माणसं घडवली. स्वाभिमान जागवून परकीय शत्रूचे आक्र मण उलथून स्वराज्याची स्थापना केली. सुरतेची लूट पद्मदुर्ग व सिंधुदुर्ग उभारणीसाठी वापरून मोगल व इंग्रजांवर जरब बसवली. राष्ट्र ही संकल्पना शिवरायांनी आचरणात आणून गड-किल्ल्यांचे संवर्धन करीत युद्धशास्त्रातील नैपुण्य सिद्ध केले. शिवाजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त तलवार घेतलेला महापुरु ष नव्हे, तर परकीयांची सत्ता रोखून स्वअस्तित्वाचा झेंडा रोवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन महापुरु ष होते. ज्याने विविध पगडीच्या लोकांना हाताशी घेऊन स्वराज्य मिळवण्यासाठी ज्योत प्रज्वलीत करून एक नवा अध्याय घडवला आहे. सुरतेची लूट ही किल्ल्याची डागडुजी व नवीन किल्ले बांधण्यासाठी त्याकाळात पैशांची आवश्यकता महाराजांना जाणवली म्हणूनच त्यांनी सुरतेची लूट करून गड-किल्ले बांधण्यावर जास्त भर दिला होता.या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, वक्तृत्व स्पर्धा समितीप्रमुख सुरेश उपाध्ये, नगरसेविका मुग्धा जोशी, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेविका अनुजा दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त लक्ष्मीखार बापूजी देव मंदिरापासून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शहरांतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. पारंपरिक वाद्य खालू बाजे, तसेच सर एस. ए. विद्यालयाचे लेझीम पथक व मजगाव येथील कसरतपटूंनी आवेशपूर्ण कवायती, दांडपट्टा आदींची प्रात्यक्षिके करून दुतर्फा गोळा झालेल्या नागरिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जोशी, दीपाली रोटकर यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद गोरे यांनी केले. (वार्ताहर)