शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

शिवचरित्र हे अक्षय ऊर्जेचा स्रोत

By admin | Updated: February 21, 2017 06:08 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना

नांदगाव/ मुरूड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य तथा त्यागाचे प्रतीक होते. अस्मानी सुलतानी संकाटाशी निकराची झुंज देताना असंख्य मावळ्यांसह रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे चरित्र समाजाला आजही अक्षय ऊर्जेचे स्रोत ठरत आहे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास अभ्यासक डॉ. माधव पोतदार यांनी केले.जंजिरा-मुरूड नगरपरिषद व शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित शिवचरित्रावर व्याख्यान देताना पोतदार बोलत होते. पोतदार म्हणाले की, शिवाजीची ओळख तलवार आणि अफझल खानाचा वध इतकी सिमित राहू नये. तर माता, मातृभूमी आणि मातृभाषा या मानदंड सगळ्याने विचार रयतेमध्ये रुजवून माणसं घडवली. स्वाभिमान जागवून परकीय शत्रूचे आक्र मण उलथून स्वराज्याची स्थापना केली. सुरतेची लूट पद्मदुर्ग व सिंधुदुर्ग उभारणीसाठी वापरून मोगल व इंग्रजांवर जरब बसवली. राष्ट्र ही संकल्पना शिवरायांनी आचरणात आणून गड-किल्ल्यांचे संवर्धन करीत युद्धशास्त्रातील नैपुण्य सिद्ध केले. शिवाजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त तलवार घेतलेला महापुरु ष नव्हे, तर परकीयांची सत्ता रोखून स्वअस्तित्वाचा झेंडा रोवणारे हे पहिले महाराष्ट्रीयन महापुरु ष होते. ज्याने विविध पगडीच्या लोकांना हाताशी घेऊन स्वराज्य मिळवण्यासाठी ज्योत प्रज्वलीत करून एक नवा अध्याय घडवला आहे. सुरतेची लूट ही किल्ल्याची डागडुजी व नवीन किल्ले बांधण्यासाठी त्याकाळात पैशांची आवश्यकता महाराजांना जाणवली म्हणूनच त्यांनी सुरतेची लूट करून गड-किल्ले बांधण्यावर जास्त भर दिला होता.या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, वक्तृत्व स्पर्धा समितीप्रमुख सुरेश उपाध्ये, नगरसेविका मुग्धा जोशी, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेविका अनुजा दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त लक्ष्मीखार बापूजी देव मंदिरापासून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शहरांतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. पारंपरिक वाद्य खालू बाजे, तसेच सर एस. ए. विद्यालयाचे लेझीम पथक व मजगाव येथील कसरतपटूंनी आवेशपूर्ण कवायती, दांडपट्टा आदींची प्रात्यक्षिके करून दुतर्फा गोळा झालेल्या नागरिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जोशी, दीपाली रोटकर यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद गोरे यांनी केले. (वार्ताहर)