शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

वरंध घाटात साईडपट्ट्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 03:47 IST

महाड-भोर-पंढरपूर हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरील वरंध घाटातील साईडपट्ट्यांची आणि संरक्षक कठड्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने

महाड : महाड-भोर-पंढरपूर हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरील वरंध घाटातील साईडपट्ट्यांची आणि संरक्षक कठड्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने हा घाट मार्ग वाहतुकीला धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी या साईडपट्ट्या व कोसळलेल्या संरक्षक कठड्यांची कामे करण्याची आवश्यकता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वरंध घाटातील अवघड वळणावर वाहने नेताना चालकांपुढे मोठी समस्या यामुळे निर्माण होत असून कोसळलेल्या कठड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. काही वर्षांपूर्वी या घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप खाली कोसळून त्यातील अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतरही या घाटात वारंवार अपघात घडत असतात. या मार्गावर पर्यटकांची वाहने, तसेच मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचीही दिवसेंदिवस वर्दळ वाढत असून या घाटातून नव्याने वाहने चालवण्याचे काम जिकिरीचे बनत आहे. वरंध गावापासून माझेरीपर्यंतचा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनाही पावसाळ्यात नियमितपणे घडत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. (वार्ताहर)वाकण-पाली मार्गावरील डोंगर पोखरल्याने झाडे कोसळण्याची भीतीपाली : वाकण-पाली रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. नवीन रस्त्याच्या दोन्ही बाजूस माती देखील टाकण्यात आली आहे. परंतु वाकणपासून जवळच असलेल्या वजनकाट्याजवळील वळणावरील रस्त्याच्या साईडपट्टीवर टाकण्यात आलेली माती तेथीलच डोंगर पोखरून काढण्यात आली. ती माती निकृष्ट दर्जाची आहे व त्यामध्ये दगड-गोटे देखील आहेत. यामुळे येथे भूस्खलन होवून झाडे रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करताना या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या डोंगरावरची माती जेसीबी मशिनच्या सहाय्याने खोदल्याने त्या डोंगरावरील मोठाले दगड रस्त्याच्या बाजूलाच पडले आहेत. तर काही मोठ्या झाडांची मुळे देखील माती उत्खननाने तुटली असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी झाडे कोसळण्याची व भूस्खलन होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठेकेदाराच्या कामाकडे लक्ष देणे गरजेचे असताना विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. पावसाळ्यात अशी मोकळी झालेली माती रस्त्यावर येवून चिखल होण्याची शक्यता आहे. तसेच तेथील डोंगर पोखरून माती काढल्याने पावसाळ्यात या डोंगरावरील वृक्ष उन्मळून व दरड कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)