शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

वेळास-दिघी बंदर रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:53 IST

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे

गणेश प्रभाळे दिघी : अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ते दिघी बंदर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दिघी बंदरातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. दिघी - माणगाव - पुणे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. त्यामुळे या मार्गावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण असणार आहे. मात्र, रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याने येथील खड्ड्यांनीच प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बनल्यानंतर हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. रस्ता आहे त्या अवस्थेत वर्ग झाल्याने, रस्ता बनवण्याच्या खर्चात नवीन रस्त्याचे काम करायचे, की आहे त्या रस्त्याची मलमपट्टी करायची हा प्रश्न कंत्राटदारांसमोर आहे. रस्त्याचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे, त्यामुळे त्याचा त्रास हा सामान्य जनतेला होत आहे. सद्यस्थितीत रस्त्याचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे.

गेल्या आठ - दहा वर्षांपासून वेळास ते दिघी बंदर रस्त्यावरून दिघी पोर्टकडील कोळसा व कॉइल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. दिघी बंदर किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पावसाअगोदर या रस्त्याची डागडुजी करायला पाहिजे होती. पावसाळ्यात होणारा पाण्याचा निचरा गटारातून होणे आवश्यक आहे. मात्र, ते पाणी सध्या रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता दिसेनासा होत आहेत, परंतु दोघांनीही या गोष्टीची पूर्वदखल घेतली नाही. त्यामुळे रिक्षा, मिनीडोर, दुचाकी वाहने व सर्वसामान्य नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वेळास फरशी ते भरणा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. येथे रस्त्याला सहा किलोमीटर अंतराचा घाट व तीव्र उतार असल्याने दुचाकीवरून जाताना मध्येच खड्डा आल्यास एखाद्याला जीवास मुकावे लागू शकते. रस्त्याच्या परिस्थितीनुसार दुरुस्तीकडे श्रीवर्धन तालुका लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.रस्त्याला जोडून असणाऱ्या डोंगरातील पाणी गटाराअभावी रस्त्यावरून वाहत आहे. मुसळधार पावसाने रस्ता खचण्याची भीती आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती लवकरच करावी. संबंधित विभागाने भोर - वरंध घाटाची पुनरावृत्ती होण्याची वाट बघू नये. - दीपक परकर, प्रवासीखड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रणदिघी बंदरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. अरुंद रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात. दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे समजले मात्र प्रत्यक्षात महामार्ग बनायला अद्याप अवकाश आहे.दिघीपर्यंतच्या रस्त्यातील खड्डे भरायचे नियोजन आहे. या महिन्यापासून पुन्हा रस्त्याचे काम सुरू होईल. - सचिन निफाडे, उपअभियंता.लोकप्रतिनिधींना नाही देणेघेणेजनसेवेसाठी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य निवडून दिले गेलेत मात्र, जनतेच्या विशेषत: रस्त्याबाबत असुविधेकडे सर्रास दुर्लक्ष होते.वाहनांचे होतेय नुकसानविशेष म्हणजे खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून जाताना महिला, रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रोजच्या प्रवासात वाहनांचे देखील नुकसान होत आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजी किंवा दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कुडगाव येथील रहिवासी महेश जाधव यांनी दिला आहे.