शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

वेळास-दिघी बंदर रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:53 IST

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे

गणेश प्रभाळे दिघी : अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ते दिघी बंदर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दिघी बंदरातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. दिघी - माणगाव - पुणे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. त्यामुळे या मार्गावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण असणार आहे. मात्र, रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याने येथील खड्ड्यांनीच प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बनल्यानंतर हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. रस्ता आहे त्या अवस्थेत वर्ग झाल्याने, रस्ता बनवण्याच्या खर्चात नवीन रस्त्याचे काम करायचे, की आहे त्या रस्त्याची मलमपट्टी करायची हा प्रश्न कंत्राटदारांसमोर आहे. रस्त्याचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे, त्यामुळे त्याचा त्रास हा सामान्य जनतेला होत आहे. सद्यस्थितीत रस्त्याचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे.

गेल्या आठ - दहा वर्षांपासून वेळास ते दिघी बंदर रस्त्यावरून दिघी पोर्टकडील कोळसा व कॉइल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. दिघी बंदर किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पावसाअगोदर या रस्त्याची डागडुजी करायला पाहिजे होती. पावसाळ्यात होणारा पाण्याचा निचरा गटारातून होणे आवश्यक आहे. मात्र, ते पाणी सध्या रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता दिसेनासा होत आहेत, परंतु दोघांनीही या गोष्टीची पूर्वदखल घेतली नाही. त्यामुळे रिक्षा, मिनीडोर, दुचाकी वाहने व सर्वसामान्य नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वेळास फरशी ते भरणा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. येथे रस्त्याला सहा किलोमीटर अंतराचा घाट व तीव्र उतार असल्याने दुचाकीवरून जाताना मध्येच खड्डा आल्यास एखाद्याला जीवास मुकावे लागू शकते. रस्त्याच्या परिस्थितीनुसार दुरुस्तीकडे श्रीवर्धन तालुका लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.रस्त्याला जोडून असणाऱ्या डोंगरातील पाणी गटाराअभावी रस्त्यावरून वाहत आहे. मुसळधार पावसाने रस्ता खचण्याची भीती आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती लवकरच करावी. संबंधित विभागाने भोर - वरंध घाटाची पुनरावृत्ती होण्याची वाट बघू नये. - दीपक परकर, प्रवासीखड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रणदिघी बंदरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. अरुंद रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात. दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे समजले मात्र प्रत्यक्षात महामार्ग बनायला अद्याप अवकाश आहे.दिघीपर्यंतच्या रस्त्यातील खड्डे भरायचे नियोजन आहे. या महिन्यापासून पुन्हा रस्त्याचे काम सुरू होईल. - सचिन निफाडे, उपअभियंता.लोकप्रतिनिधींना नाही देणेघेणेजनसेवेसाठी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य निवडून दिले गेलेत मात्र, जनतेच्या विशेषत: रस्त्याबाबत असुविधेकडे सर्रास दुर्लक्ष होते.वाहनांचे होतेय नुकसानविशेष म्हणजे खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून जाताना महिला, रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रोजच्या प्रवासात वाहनांचे देखील नुकसान होत आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजी किंवा दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कुडगाव येथील रहिवासी महेश जाधव यांनी दिला आहे.