शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनच्या ‘महावितरण’चे काम रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:47 IST

उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक; वाकलघर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ग्रामीण, दिघी, दिवेआगर कार्यालय अभियंत्याविना

गणेश प्रभाळे।लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असणाºया दुय्यम कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्राहकांना काम न झाल्याने परत जावे लागते. विभागातील या कार्यालयांचे काम ‘राम भरोसे’ असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. वाढत्या वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय अधिकारी भेटत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील महावितरण सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतून दिघी तसेच वाकलघर येथील कार्यालयात वीजबिल कमी करण्यास आलेल्या ग्राहकाला अधिकारी न भेटल्याने नाराज होत परतावे लागते.श्रीवर्धन तालुक्यातील पाच ठिकाणी प्रमुख गावांमध्ये दुय्यम अभियंता कार्यालय आहेत. मात्र, वाढत्या वीजग्राहकांच्या समस्येमुळे व तालुक्यातील पाच विभागीय कार्यालय पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील ताण वाढू लागला आहे. त्यामुळे महावितरणने पदे भरून सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. स्थानिक कार्यालयात अधिकारी नसल्याने ग्राहक श्रीवर्धन कार्यालयात येत असतात. मात्र, येथील उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे विविध कामांसाठी येणाºया ग्राहकांची रांग वाढत असते. रांगेत उभ्या असलेल्या बहुतांशी व्यक्तींच्या तक्रारी वाढीव बिलासंदर्भात असतात. तर काही जण बंद झालेल्या मीटरच्या तक्रारी घेऊन येतात. दर महिन्याला वीजबिल येत नाही, तर कार्यालयात घेऊन जावे, असे सांगण्यात येते. वाढीव बिलाबाबत श्रीवर्धन येथे ये-जा होत असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.साहेबांना भेटामहावितरण कार्यालयात तक्रार घेऊन जाणाºया ग्राहकांच्या समस्येचे निवारण होत नाही. वीजबिलावर संबंधित मीटरचा फोटो असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक बिलावर फोटोच नसतात. फोटो असले तरी सुस्पष्ट नसतात, अनेक ग्राहकांना बिल येतच नाही. याविषयी चौकशी केल्यास, मंडळाकडे आपली रक्कम अधिकची आल्याने बिल पाठविले असल्याचे सांगतात. अनेक ग्राहकांना मजुरीचे काम सोडून या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कर्मचाºयांना विचारल्यास साहेबांना भेटा, असे सांगण्यात येते. विद्युत अभियंते कार्यालयात सापडतच नाही. त्यामुळे ग्राहकांना तासन्तास वाट बघत बसावे लागते.पदे रिक्त असल्याने सेवेचा बोजवारामहावितरण कंपनीत शाखा अभियंता, लाइनमन, वायरमन, आॅपरेटर आदीसह विविध प्रकारची पदे कार्यरत आहेत. ग्राहकसेवेच्या दृष्टीने प्रामुख्याने लाइनमन, असि. लाइनमन आणि शाखा अभियंता या पदांना अधिक महत्त्व आहे. इतर पदेही तितकीच महत्त्वाची असली तरी या पदाचा थेट ग्राहक सेवेवर परिणाम होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत श्रीवर्धनमध्ये लाइनमन, असि. लाइनमन आणि शाखा अभियंता ही पदे रिक्त राहत आहेत. याकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असते. मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने ग्राहक सेवेचा बोजवारा उडत आहे.तालुक्यातील बहुतेक गावात घरातील माणसे मोलमजुरीसाठी घराबाहेर जात असल्याने कामाच्या व्यापात बिल भरण्यास वेळ लागतो. दोन दिवसांत ते भरले नाही तर डीपीसी भरावा लागत आहे. शिवाय, वेळेत रीडिंग घेत नसल्याने पुढील वेळेला वाढीव बिल येईल, अशी भीती नागरिकांना असते. महावितरण आता बिल थकले की, लगेच वीजपुरवठा खंडित करते. हा नेहमीचाच प्रकार असून रीडिंग घेणाºया कर्मचाºयावर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. परिणामी, अंदाजे रीडिंग घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ऐनवेळी अवाजवी देयक येत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहे. - श्रीधर शेलार, गाव अध्यक्ष, वाकलघर.वाकलघर कार्यालयाला कुलुप1तालुक्यातील वाकलघर येथील दुय्यम अभियंता कार्यालय नेहमीच बंद असते. या कार्यालयासंबंधित बोर्ला, वावेपंचतन, धनगरमलई, देवखोल, नागलोली, नागलोली मधलीवाडी, खुजारे, दांडगुरी, कार्ले या गावांसह इतर वाड्या मिळून १६ गावांचा समावेश आहे.2वाकलघर परिसरातील ग्राहकांना बिलासंबंधीच्या तक्रारीसाठी श्रीवर्धन येथे जावे लागते. वाकलघर येथील महावितरण दुय्यम कार्यालयात रोशन साथींगे यांची नियुक्ती असून ते प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे रजेवर आहेत. तेथे उपलब्ध अतिरिक्त अभियंता आदित्य जाधव आहेत.3सध्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन ग्रामीण, दिघी, वाकलघर, दिवेआगर व उपविभागीय मुख्यकार्यालयीन दोन अशा सात ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदे रिक्त आहेत.जाधव यांच्याकडे हरिहरेश्वर,श्रीवर्धन ग्रामीण, दिवेआगर व उपविभागीय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.4वीजबिल कमी करण्यासंदर्भात २० ते ३० कि.मी. अंतरावरून श्रीवर्धन येथे जावे लागते, वाकलघर येथे महावितरणचे कार्यालय असूनही कामकाज होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.