शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल; हॉटेल व्यावसायिकांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:55 IST

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला.

अलिबाग : कोरोनाची भीती अजूनही डोक्यावर असतानाच गेल्या आठ महिन्यांच्या लॉकडाऊनचा तणाव घालविण्यासाठी पर्यटकांनी शनिवारपासून आजच्या तिसऱ्या दिवशी रायगडात विक्रमी गर्दी केली आहे. अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या तालुक्यांतील किनारे पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले आहेत. पर्यटकांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लॉकडाऊनमुळे ओस पडलेले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

अलिबाग तालुक्यातील मांडवा, किहीम, वरसोली, अलिबाग, नागाव, मुरूडमधील काशीद, मुरूड, पुढे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटनाच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रसिद्ध असणारे दिवेआगर येथे येण्याची पर्यटकांना उत्सुकता असते. 

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली स्थिती, यामुळे कोकणातल्या पर्यटन उद्योगाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. मात्र, दिवाळीनंतर गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच महिन्यांनंतर हॉटेल व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.कोरोना संकट असल्याने पर्यटकांची संख्या या वेळी कमी झाली आहे. काही मोजक्याच लॉज, रिसॉर्टला दिवाळीत पूर्ण बुकिंग असले तरी अनेक ठिकाणी पर्यटकांच्या बुकिंगसाठी घासाघीस करावी लागत आहे. रूमचे दर ऐकून पुन्हा पर्यटक फोन करीत नाहीत. त्यामुळे रिसॉर्ट, लॉजिंगचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्नही व्यावसायिकांना पडला आहे.

ऐतिहासिक स्थळांवरही वळू लागली पर्यटकांची पावलेरायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या छोट्या व्यावसायिकांनाही दिवाळीत फटका बसला आहे. शासनाने समुद्रकिनारी पर्यटन सुरू केले असले तरी ऐतिहासिक गड, किल्ले, वास्तू यांच्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे शिवप्रेमी, ट्रेकिंग, सामाजिक संस्थांनी गड, किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, नुकतीच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गड, किल्ले ऐतिहासिक वास्तू हे कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना खुले केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागू झाल्यामुळे या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला आता चालना मिळणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड