शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिवशाहीला वाहतूककोंडीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:07 IST

पेणमध्ये अरुंद रस्ते; फेऱ्यांचा मार्ग बदलल्याने प्रवाशांना त्रास

- सिकंदर अनवारे दासगाव : सिकंदर अनवारे : महाड आगारातून सुटणारी शिवशाही बस यापूर्वी रामवाडी येथे जाऊन थेट पनवेल गाठत होती. मात्र, या फेरीत पेण परिवहन कार्यालयाने बदल करून शिवशाही बस पेण आगारात नेण्याचे फर्मान काढले. यामुळे चालकांना पेणमधील वाहतूककोंडीतून आणि अरुंद रस्त्यातून वाट काढत पेण आगार गाठावे लागत आहे. परिणामी, जलद प्रवासाची अपेक्षा ठेवून शिवशाहीत बसणाºया प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.महाड आगाराने महाड-मुंबई, महाड-बोरीवली, महाड-ठाणे अशा शिवशाही सुरू केल्या आहेत. यामुळे मुंबई, बोरीवलीकडे जाणाºया प्रवाशांनी शिवशाही बसला प्राधान्य दिले. अल्पावधीतच बस फुल्ल होऊ लागली. महाडमधून जवळपास सहा फेºया शिवशाहीच्या होत आहेत. यामध्ये बोरीवली, मुंबई, पनवेल या फेºयांचा समावेश आहे.महाडमधून ६.४५ वाजता सुटणारी पहिली शिवशाही आणि यापूर्वीची निमआराम बस गेली अनेक वर्षे खचाखच भरून जात आहे. महाड, माणगाव, रामवाडी आणि पनवेल असा प्रवास करत बस थेट जात असल्याने प्रवाशांनी पसंती दिली. कमी वेळात आरामदायी प्रवास असल्याने अधिकारी, व्यापारी वर्गाने मुंबईकडे जाताना या बसचा पर्याय निवडला. मात्र, गेली काही दिवसांपासून या शिवशाही बस पेण शहरात जात असल्याने वेळ आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.रामवाडीच्या पुढील स्थानक हे पेण आहे. पेण स्थानक हे शहरात आहे. याठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरून आत प्रवेश करावा लागतो.रस्त्यालगत दुकाने, छोटे व्यापारी बसत असल्याने तो अरु ंद झाला आहे. त्यातच विक्र म रिक्षा, तीन आसनी रिक्षा, पेण आगाराच्या समोरच ये-जा करीत असल्याने एस.टी.च्या मोठ्या बसेस आणि शिवशाही बसला आगारात प्रवेश करताना अडचणी येतात.पेण आगारात आधीच अरुंद जागा आहे. आगारातील रस्ताही खराब आहे. ज्या ठिकाणी आगारात प्रवेश केला जातो त्या ठिकाणी रस्ता आणि आगारातील परिसर यामध्ये तफावत असल्याने बसचा मागील भाग आपटला जातो. यामुळे बसचेही नुकसान होत आहे.घाट मार्गावर असलेली वळणे, उतारावर मागील भाग घासणे यामुळे भोर मार्गे जाणारी शिवशाही बस बंद करण्यात आली आहे. मग पेण आगारातील खराब रस्ता, मागील भाग घासणे, वाहतूककोंडी, अपघाताचा धोका हे संभाव्य प्रश्न समोर असताना पेण आगारात शिवशाही बस नेण्याचा हा प्रयोग कोणी केला असा प्रश्न निर्माण होत आहे.महाड आगारातून सुटणाºया शिवशाही बसेस या पेणमधील अरुं द आणि गर्दीच्या ठिकाणी जात असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीत वेळ वाया जात आहे.- रितेश कुमार सिंग, प्रवासीमहाड आगारातून सुटणारी पावणेसहा आणि सव्वापाचची शिवशाही बस वगळता अन्य बसेस या पेण आगारात जातात.- शिवाजी जाधव, सहायक वाहतूक निरीक्षक, महाड

टॅग्स :ShivshahiशिवशाहीRaigadरायगड