शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:32 IST

शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही.

श्रीवर्धन : शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मराठी माणूस हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहे. कुठेही विकास दृष्टीस पडत नाही. मनोहर जोशी, नारायण राणे कोकणातून मुख्यमंत्री झाले, परंतु कोकणास काय मिळाले? मुंबई-गोवा रस्ता होऊ शकला नाही. शेतीचा विकास झाला नाही, उद्योग कोकणात आले नाही त्या कारणे तरु णांना काम मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केले.श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगरपालिका मैदानावर सोमवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. या सभेस संबोधित करताना अजित पवार बोलत होते. विद्यमान राज्य सरकार सर्वत्र अपयशी ठरले आहे. राज्यातील १३ हजार शाळा बंद केल्या आहेत, ६७ हजार बालके कुपोषित झालेले आहेत. सीमा भागात शत्रू राष्ट्र दररोज हल्ले चढवत आहे,परंतु ५६ इंच छाती कुठे गेली? असा प्रश्न करत आज याचा शोध घ्यावा लागेल, अशी पवार यांनी पंतप्रधान यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे राज्य आहे. भाजपा व सेना यांच्या युती सरकारने राज्यातील बहुजन समाज संकटात सापडला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात कोरेगाव भीमासारखी घटना लाजिरवाणी आहे. त्यामुळे सामाजिक शांती नष्ट होत आहे. युती सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन कष्टमय झाले आहे. सण-उत्सव साजरे करणे अशक्य झाले आहे. आम्ही धनगर, मराठा व मुस्लीम या समाजांसाठी आरक्षण दिले, परंतु युती सरकार ते टिकवण्यात अयशस्वी झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनोगतात श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामे व जनतेचा विकास या विषयी विचार व्यक्त केले. याकार्यक्र मप्रसंगी अनिकेत तटकरे व अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीवर्धनमधील भुवनाळे तलाव, समुद्र किनारी व शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरेबसवण्यात आले. तसेच श्रीवर्धन शहरात लघुदाब भूमिगत विद्युत वाहिनीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार