शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:32 IST

शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही.

श्रीवर्धन : शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मराठी माणूस हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहे. कुठेही विकास दृष्टीस पडत नाही. मनोहर जोशी, नारायण राणे कोकणातून मुख्यमंत्री झाले, परंतु कोकणास काय मिळाले? मुंबई-गोवा रस्ता होऊ शकला नाही. शेतीचा विकास झाला नाही, उद्योग कोकणात आले नाही त्या कारणे तरु णांना काम मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केले.श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगरपालिका मैदानावर सोमवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. या सभेस संबोधित करताना अजित पवार बोलत होते. विद्यमान राज्य सरकार सर्वत्र अपयशी ठरले आहे. राज्यातील १३ हजार शाळा बंद केल्या आहेत, ६७ हजार बालके कुपोषित झालेले आहेत. सीमा भागात शत्रू राष्ट्र दररोज हल्ले चढवत आहे,परंतु ५६ इंच छाती कुठे गेली? असा प्रश्न करत आज याचा शोध घ्यावा लागेल, अशी पवार यांनी पंतप्रधान यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे राज्य आहे. भाजपा व सेना यांच्या युती सरकारने राज्यातील बहुजन समाज संकटात सापडला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात कोरेगाव भीमासारखी घटना लाजिरवाणी आहे. त्यामुळे सामाजिक शांती नष्ट होत आहे. युती सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन कष्टमय झाले आहे. सण-उत्सव साजरे करणे अशक्य झाले आहे. आम्ही धनगर, मराठा व मुस्लीम या समाजांसाठी आरक्षण दिले, परंतु युती सरकार ते टिकवण्यात अयशस्वी झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनोगतात श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामे व जनतेचा विकास या विषयी विचार व्यक्त केले. याकार्यक्र मप्रसंगी अनिकेत तटकरे व अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीवर्धनमधील भुवनाळे तलाव, समुद्र किनारी व शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरेबसवण्यात आले. तसेच श्रीवर्धन शहरात लघुदाब भूमिगत विद्युत वाहिनीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार