शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:32 IST

शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही.

श्रीवर्धन : शिवसेनेने ‘मराठी माणूस’ हा मुद्दा बनवत कोकणात विस्तार केला. बाळासाहेबांचा करिश्मा होता त्यामुळे जनतेने शिवसेना स्वीकारली, परंतु आता जुनी शिवसेना संपली आहे. स्वाभिमान हरवल्यामुळे शिवसेना सत्ता सोडत नाही. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मराठी माणूस हालअपेष्टा सहन करत जीवन जगत आहे. कुठेही विकास दृष्टीस पडत नाही. मनोहर जोशी, नारायण राणे कोकणातून मुख्यमंत्री झाले, परंतु कोकणास काय मिळाले? मुंबई-गोवा रस्ता होऊ शकला नाही. शेतीचा विकास झाला नाही, उद्योग कोकणात आले नाही त्या कारणे तरु णांना काम मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केले.श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगरपालिका मैदानावर सोमवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. या सभेस संबोधित करताना अजित पवार बोलत होते. विद्यमान राज्य सरकार सर्वत्र अपयशी ठरले आहे. राज्यातील १३ हजार शाळा बंद केल्या आहेत, ६७ हजार बालके कुपोषित झालेले आहेत. सीमा भागात शत्रू राष्ट्र दररोज हल्ले चढवत आहे,परंतु ५६ इंच छाती कुठे गेली? असा प्रश्न करत आज याचा शोध घ्यावा लागेल, अशी पवार यांनी पंतप्रधान यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगणारे राज्य आहे. भाजपा व सेना यांच्या युती सरकारने राज्यातील बहुजन समाज संकटात सापडला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात कोरेगाव भीमासारखी घटना लाजिरवाणी आहे. त्यामुळे सामाजिक शांती नष्ट होत आहे. युती सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन कष्टमय झाले आहे. सण-उत्सव साजरे करणे अशक्य झाले आहे. आम्ही धनगर, मराठा व मुस्लीम या समाजांसाठी आरक्षण दिले, परंतु युती सरकार ते टिकवण्यात अयशस्वी झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मनोगतात श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामे व जनतेचा विकास या विषयी विचार व्यक्त केले. याकार्यक्र मप्रसंगी अनिकेत तटकरे व अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीवर्धनमधील भुवनाळे तलाव, समुद्र किनारी व शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरेबसवण्यात आले. तसेच श्रीवर्धन शहरात लघुदाब भूमिगत विद्युत वाहिनीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार