शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:31 IST

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय तख्तावर शिवसेना स्वबळावर लढणार असून यापुढे भाजपाशी कदापि युती करणार नाही.

पेण : महाराष्ट्र राज्याच्या राजकीय तख्तावर शिवसेना स्वबळावर लढणार असून यापुढे भाजपाशी कदापि युती करणार नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असून विधानसभेवर एकहाती सत्ता येण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वज्रनिर्धार मेळावा झाला असून निवडणुका कधीही जाहिर होवोत प्रत्येक शिवसैनिक विधानसभेवर भगवा फडकविण्यास सज्ज झाला आहे. रायगडातील लोकसभा व सात विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल. हा आत्वविश्वास पेणच्या निर्धार मेळाव्याची उपस्थितीवरून लक्षात येते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने भाजपाच्या पोटात भितीचा गोळा उठला असून मुंबई बीकेशी येथे झालेल्या भाजपा मेळाव्यात भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम शत प्रतिशत भाजपची भूमिकेला बगल देत एनडीएचे सरकार येणार ही भाजपाची बदललेली भूमिका पुतण मावशीचे प्रेम आहे.शिवसेना यांचे मनसुबे ओळखून आहे. आम्ही शिवसैनिक विधानसभेवर भगवे तोरण बांधण्याचा निर्धार केलेला आहे. तो पूर्ण करण्यासाठीच निर्धार मेळावा आहे. शिवसेना सत्तेत राहून जनहिताचे प्रश्न मार्गी लावते आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत. ज्यावेळी उद्धव ठाकरे आदेश देतील त्या क्षणी सत्ता सोडून परंतु भाजपाशी सोयरिक करणार नाही, अशा घणाघाती शब्दात शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपावर हल्लाबोल चढविला.पेणच्या नगर पालिका मैदानावर शिवसेनेचा निर्धार मेळावा शनिवारी सायंकाळी ६ वाजता सुरू झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री अनंत गीते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, किशोरीताई पेडणेकर, शिवसेने उपनेते विजय कदम, संजय मोरे, बबन पाटील, किशोर जैन, शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पं. स. सभापती, सदस्य, सरपंच, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, युवा सेना, महिला आघाडी प्रमुख विभागावर पदाधिकारी व चार ते पाच हजार शिवसैनिकांची निर्धार मेळाव्यास उपस्थिती होती.शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना सुभाष देसाई यांनी पेण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून मुंबई, नवी मुंबई, उरण जेएनपीटी व पनवेल महानगर पालिका क्षेत्रात विस्तारीत असलेले औद्योगिककरण व नागरीकरणामुळे विकासाचा वेग वाढला आहे. पोर्ट टर्मिनल, पेण-अलिबा व पेण-रोहा रेल्सेसेवा, मुंबई’गोवा राष्टÑीय महामार्ग रुंदीकरण प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगितले. या मेळाव्याची संपूर्ण जिल्हयात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई