शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:21 IST

भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे.

- मधुकर ठाकूर उरण : भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे. ही अधोगती बाजारपेठेतील परिस्थितीमुळे नसून गुजरातच्या बंदरांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सहकार्याचे हे परिणाम आहेत. जास्तीत-जास्त कार्गो (मालवाहतूक) ही जेएनपीटीकडून मुंद्रा या गुजरातेतील बंदरावर वळवण्यात आली आहे. २०१८ च्या १, २ आणि ३ नोटिफिकेशन्समधून परदेशी कंटेनर्सचा परवाना शिपिंग कंपन्यांतर्फे गुजरातमधून केला आहे.एमएससी मेडिटेरॅनियन शिपिंग आणि वर्षाकाठी सुमारे तीन लाख कंटेनर मालाची वाहतूक करणारी हुण्डाई कंपनीने यापूर्वीच मालवाहतूक सेवा जेएनपीसीटीकडून मुंद्रा आणि अन्य बंदरांंकडे वळवल्या आहेत. त्यामुळे दरमहा कोट्यवधींचे नुकसान जेएनपीटीला सहन करावे लागत आहे.गुजरातस्थित बंदरांवर सागरी वाहतूक वळवल्यामुळे जेएनपीटी परिसरातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकºयांवर गदा येण्याची शक्यता आहे. जेएनपीसीटीमध्ये नवीन रोजगार संधीही यापुढे उपलब्ध होणार नसल्याची खंत कामगार आणि काही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.अदानी बंदरांच्या उदयामुळे (मुंद्रा, हाजिरा आणि दहेज) जेएनपीसीटीचे महत्त्व कमी होत चालले आहे. या उलट, गुजरातस्थित बंदरांवर रोजगार संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या असून सहायक सरकारी धोरणांमुळे हे घडत आहे. गेल्या काही वर्षांत मोठे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले असल्याचाही हा परिणाम आहे. भारतातील परदेशी कंपन्यांसाठी अंतर्गत नेव्हिगेशन उघडण्याच्या शिपिंग धोरणात अलीकडेच झालेल्या बदलांनी या वाढत्या ट्रेण्डला आणखी पाठबळ मिळाले. यामुळेच जेएनपीटी बंदरावर गंडांतर येऊ लागल्याचा आरोपही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून होत आहे.गुजरातमधील अदानी बंदराला झुकते माप दिल्यामुळे, तेथील व्यवसाय वाढला असून महाराष्ट्रातील व्यवसाय ठप्प होत आहे. परिणामी रोजगार निर्मितीही गुजरातमध्ये होत आहे. महाराष्ट्र राज्य सागरी हद्दीतले महत्त्वाचे केंद्र आहे. कोकणातील तरुण गेली कित्येक पिढ्या सागरी व्यापारी नौकांवर कार्यरत असल्याची प्रतिक्रिया एका स्थानिक नेत्याने यावेळी दिली. भारतीय शिपिंग कंपन्यांसाठी मालवाहनाच्या धोरणांत घट करण्यात आली आहे. मात्र अदानी आणि गुजरातच्या पथ्यावर पडेल, अशीच धोरणे नव्याने आखण्यात येत असल्याची माहिती शिपिंग उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. काही शिपिंग कंपन्यांंनी कंटेनर वाहतूक जेएनपीसीटी बंदरातून जेएनपीटीअंतर्गत असलेल्या इतर खासगी बंदरांकडे वळवली असली तरी रॉयल्टीतून मिळणाºया उत्पादनाचा फायदा जेएनपीटीलाच होणार आहे.जेएनपीटीने डिसेंबर २०१८ मध्ये ४.४५ लाख टीईयूएस इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराचा व्यवसाय कमी झाला नसून वाढतच चालला असल्याचा दावा जेएनपीटीने केला आहे. मात्र कंटेनर हाताळणीच्या विलंबामुळे जेएनपीसीटीच्या अनेक शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे वळू लागल्याच्या प्रश्नावर जेएनपीटीकडून मौन पाळले आहे. जेएनपीसीटी सोडून काही शिपिंग कंपन्यांंची मालवाहू जहाजे जेएनपीटीअंतर्गत असलेल्या खासगी बंदरांकडे जाण्याने जेएनपीटीला रॉयल्टी मिळत असली तरी त्यामुळे कामगारांचे काम कमी होऊ लागले आहे. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप जेएनपीटी कामगारांकडून केला जात आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीGujaratगुजरात