शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

जेएनपीसीटीमधील शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे; रोजगाराच्या संधी कमी होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:21 IST

भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे.

- मधुकर ठाकूर उरण : भारतीय शिपिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण असलेले जेएनपीसीटी बंदर गेली काही वर्षे भारतीय शिपिंग क्षेत्रातून लोप पावत आहे. ही अधोगती बाजारपेठेतील परिस्थितीमुळे नसून गुजरातच्या बंदरांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सहकार्याचे हे परिणाम आहेत. जास्तीत-जास्त कार्गो (मालवाहतूक) ही जेएनपीटीकडून मुंद्रा या गुजरातेतील बंदरावर वळवण्यात आली आहे. २०१८ च्या १, २ आणि ३ नोटिफिकेशन्समधून परदेशी कंटेनर्सचा परवाना शिपिंग कंपन्यांतर्फे गुजरातमधून केला आहे.एमएससी मेडिटेरॅनियन शिपिंग आणि वर्षाकाठी सुमारे तीन लाख कंटेनर मालाची वाहतूक करणारी हुण्डाई कंपनीने यापूर्वीच मालवाहतूक सेवा जेएनपीसीटीकडून मुंद्रा आणि अन्य बंदरांंकडे वळवल्या आहेत. त्यामुळे दरमहा कोट्यवधींचे नुकसान जेएनपीटीला सहन करावे लागत आहे.गुजरातस्थित बंदरांवर सागरी वाहतूक वळवल्यामुळे जेएनपीटी परिसरातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकºयांवर गदा येण्याची शक्यता आहे. जेएनपीसीटीमध्ये नवीन रोजगार संधीही यापुढे उपलब्ध होणार नसल्याची खंत कामगार आणि काही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.अदानी बंदरांच्या उदयामुळे (मुंद्रा, हाजिरा आणि दहेज) जेएनपीसीटीचे महत्त्व कमी होत चालले आहे. या उलट, गुजरातस्थित बंदरांवर रोजगार संधी मोठ्या प्रमाणात खुल्या झाल्या असून सहायक सरकारी धोरणांमुळे हे घडत आहे. गेल्या काही वर्षांत मोठे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले असल्याचाही हा परिणाम आहे. भारतातील परदेशी कंपन्यांसाठी अंतर्गत नेव्हिगेशन उघडण्याच्या शिपिंग धोरणात अलीकडेच झालेल्या बदलांनी या वाढत्या ट्रेण्डला आणखी पाठबळ मिळाले. यामुळेच जेएनपीटी बंदरावर गंडांतर येऊ लागल्याचा आरोपही शिपिंग कंपन्यांंच्या अधिकाºयांकडून होत आहे.गुजरातमधील अदानी बंदराला झुकते माप दिल्यामुळे, तेथील व्यवसाय वाढला असून महाराष्ट्रातील व्यवसाय ठप्प होत आहे. परिणामी रोजगार निर्मितीही गुजरातमध्ये होत आहे. महाराष्ट्र राज्य सागरी हद्दीतले महत्त्वाचे केंद्र आहे. कोकणातील तरुण गेली कित्येक पिढ्या सागरी व्यापारी नौकांवर कार्यरत असल्याची प्रतिक्रिया एका स्थानिक नेत्याने यावेळी दिली. भारतीय शिपिंग कंपन्यांसाठी मालवाहनाच्या धोरणांत घट करण्यात आली आहे. मात्र अदानी आणि गुजरातच्या पथ्यावर पडेल, अशीच धोरणे नव्याने आखण्यात येत असल्याची माहिती शिपिंग उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. काही शिपिंग कंपन्यांंनी कंटेनर वाहतूक जेएनपीसीटी बंदरातून जेएनपीटीअंतर्गत असलेल्या इतर खासगी बंदरांकडे वळवली असली तरी रॉयल्टीतून मिळणाºया उत्पादनाचा फायदा जेएनपीटीलाच होणार आहे.जेएनपीटीने डिसेंबर २०१८ मध्ये ४.४५ लाख टीईयूएस इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराचा व्यवसाय कमी झाला नसून वाढतच चालला असल्याचा दावा जेएनपीटीने केला आहे. मात्र कंटेनर हाताळणीच्या विलंबामुळे जेएनपीसीटीच्या अनेक शिपिंग लाइन्सची जहाजे गुजरातकडे वळू लागल्याच्या प्रश्नावर जेएनपीटीकडून मौन पाळले आहे. जेएनपीसीटी सोडून काही शिपिंग कंपन्यांंची मालवाहू जहाजे जेएनपीटीअंतर्गत असलेल्या खासगी बंदरांकडे जाण्याने जेएनपीटीला रॉयल्टी मिळत असली तरी त्यामुळे कामगारांचे काम कमी होऊ लागले आहे. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप जेएनपीटी कामगारांकडून केला जात आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीGujaratगुजरात