शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

मुंबई विद्यापीठात पालीतील प्रकल्पाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 00:55 IST

महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रा. अंजली सुधीर पुराणिक यांनी सादर केलेला ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा संशोधन प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात आयोजित १३ व्या अविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात पाली येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्रा. अंजली सुधीर पुराणिक यांनी सादर केलेला ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ हा संशोधन प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे. याशिवाय आठ सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह मुंबई विद्यापीठाच्या महोत्सवातही प्रकल्पाने बाजी मारली आहे.औद्योगिक प्रदूषणामध्ये धूलिकण, हरितवायू, आम्ल गुणधर्म असलेले वायू यांचा समावेश होतो. बहुतेक सर्व कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूंमधून धूलिकण बाजूला केले जातात; परंतू हरितवायू व आम्ल वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जातात, यामुळे वैश्विक तापमानवाढीला हातभार लागतो. हे घातक वायू त्यांच्या उगमस्थानीच थांबविण्यासाठी पुराणिक यांनी ‘ए ग्रीन अ‍ॅप्रोच टू क्लिन इंडस्ट्रियल एमिशन्स’ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. यामध्ये एक नावीन्यपूर्ण मिश्रण तयार करण्यात आले असून, शोषण (अ‍ॅडसॉर्पश) प्रक्रियेच्या मदतीने वायुप्रदूषण थांबविण्यात प्रकल्प यशस्वी झाला असल्याची माहिती प्रा. अंजली पुराणिक यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, संशोधनाची आवड निर्माण करणे, भविष्याला पूरक ठरू शकणारे संशोधन करणाºया विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रोत्साहित करणे, २००७-०८ मध्ये महाराष्टÑाचे तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या संकल्पनेतून ‘अविष्कार’ हा संशोधन महोत्सव सुरू करण्यात आला. संशोधनात गुरू के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या डॉ. भानू रामन यांचे मार्गदर्शन, मुंबई विद्यापीठाच्या अविष्कारचे विशेष कार्य अधिकारी डॉ. एस. एम. बर्वे, डॉ. एम. एन. मोमिन व डॉ. मीनाक्षी गुरव यांचे मार्गदर्शन, प्राचार्य युवराज महाजन व वसंत ओसवाल यांचे प्रोत्साहन लाभल्याचे पुराणिक यांनी सांगितले.>२० विद्यापीठांतील ५८० स्पर्धक सहभागीमहोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय व औषध निर्माण या दहा शाखांमधून विद्यापीठीय शिक्षणातील विविध पातळीवरील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होत असतात. प्रत्येक विद्यापीठाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४८ जणांचा संघ सहभागी होतो. प्रत्येक शाखांतील चार वेगवेगळ्या गटांमधून प्रथम येणाºया दोन स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व रोख पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठातील, ५८० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी १४१ विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रकल्प सादर केले, तर ४३९ स्पर्धकांनी पोस्टर्स सादर केले.