शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

पेणमध्ये ४००० हेक्टर भातपिकाची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:00 IST

चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली.

पेण : चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह आलेल्या परतीच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे कापलेली भाताची कडपे लोंब्यांसह पाण्यात भिजल्याने भाताचा दाणा फुगून त्याला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवारीही पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.तालुका कृषी विभागाने तातडीने शेताच्या बांधावर धाव घेत बाधित शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत. पेण तालुक्यातील एकूण भात लागवड केलेल्या १२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रांपैकी ४० टक्के क्षेत्र अंदाजे ४००० हेक्टरवरील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, आतापर्यंत २२५० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांनी स्पष्ट केले.यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पीकही चांगले आले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी केली. गेले दोन दिवस सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तहसील कार्यालयाने शेती नुकसानाच्या पंचनाम्याच्या सूचना केल्यावर, तालुका कृषी अधिकाºयांनी तातडीने कामास सुरुवात केली आहे.>शेतकरी आर्थिक संकटातपेणच्या एकूण लागवड झालेल्या १२ हजार ४०० हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रात खारेपाटातील शेती समाविष्ट आहे. यापूर्वी झालेली चक्रिवादळात उभे पीक भुईसपाट झाले होते. त्यावर आता दोन दिवस वादळी पावसाने कापणी केलेली शेती, उडवी व कापायची राहिलेली शेती असे अंदाजे ४००० हेक्टर क्षेत्रावर परतीच्या पावसाने कहर माजवला आहे. या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील नुकसानाचा आकडा मोठा असून, पंचनामे थेट शेताच्या बांधावर जाऊन कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून शासकीय कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत.