शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

जयंत धुळप यांना ‘सावली गौरव’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:11 IST

सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अलिबाग : सावली सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावली गौरव’ पुरस्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.बदलापूर येथील मोरे मंगल कार्यालयात रविवारी आयोजित कार्यक्रमात बदलापूर महापालिकेचे आरोग्य सभापती श्रीधर पाटील, अ‍ॅड. अण्णासाहेब सावंत महाड को-आॅप अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.विनोद देशमुख, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, साहित्यआभाच्या संपादिका शारदा धुळप, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, सावलीचे संस्थापक अध्यक्ष गणराज जैन, डॉ. अर्चना जैन, डॉ.अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.काळानुरूप बदलत गेलेल्या पत्रकारितेचा लेखाजोखा यावेळी चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मांडला. पत्रकारिता करताना आपण करीत असलेल्या कामावर निष्ठा असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात सावली सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणराज जैन यांनी संस्थेच्या स्थापनेची माहिती देऊन आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी जयंत धुळप यांच्या पत्रकारितेतील विविध बातम्या आणि प्रसंगांचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले आणि धुळप यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. साहित्यआभाच्या संपादिका शारदा धुळप आणि जयंत धुळप यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात बदलापूर येथे सफर प्राणी सुश्रुषा केंद्राकरिता जागा उपलब्ध करून देणारे म्हात्रे कुटुंबीय, गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली बदलापूरची स्केटिंगबेबी निष्का यादव आणि अभिनेत्री मृणाल चेंबूरकर यांचा शानदार सत्कार करण्यात आला. गौरव सोहळ््यानंतर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, भरत दौंडकर,तुकाराम धांडे आणि प्रा.प्रशांत मोरे यांच्या ‘रंग कवितेचे’ या सुरेख काव्य मैफलीचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. प्रारंभी सावली सामाजिक संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणारी गोविंद पारकर आणि पवित्र श्रीवास्तव यांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता गोविंद पारकर, पवित्र श्रीवास्तव, श्वेता कोहोजकर, श्याम माळी, संदेश भोईर, आशिष गडगे, अंकिता देसाई, मंजुळा निरगुडा आदींनी परिश्रम घेतले.