शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत; राजकीय घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:20 IST

सुरुवातील प्रिया ढवळे यांना सरपंचपदासाठी देऊ केलेली उमेदवारी मागे घेत परेश यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज ढवळे यांनी शेकाप आणि चेंढरे परिवर्तन आघाडीच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले आहे

अलिबाग : चेंढरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणारे दत्ता ढवळे यांच्या पाठोपाठ शेकापचे कार्यालयीन जिल्हा चिटणीस परेश देशमुख यांनीही शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चेंढरे परिवर्तन आघाडीची मोट बांधणारे ढवळे यांच्या पत्नीची सरपंचपदाची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या ढवळे यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल करताना अन्य सदस्यांना उमेदवारी देत स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उभे केले आहे, त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.

चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये सध्या शेकापची सत्ता आहे. शेकापला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य दत्ता ढवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत चेंढरे परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली. सरपंचपदासाठी सुरुवातीला ढवळे यांच्या पत्नी प्रिया ढवळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, काही वेगाने राजकीय घडामोडी घडत शेकापचे परेश देशमुख यांनी शेकाप सोडत भाजपच्या तंबूत प्रवेश केला.

त्यामुळे सुरुवातील प्रिया ढवळे यांना सरपंचपदासाठी देऊ केलेली उमेदवारी मागे घेत परेश यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज ढवळे यांनी शेकाप आणि चेंढरे परिवर्तन आघाडीच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले आहे. गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकाप, परिवर्तन आघाडी यांच्यासह ढवळे यांनीही आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. ढवळे यांचा परिवर्तन आघाडीला पाठिंबा राहण्याचे मनसुबे त्यामुळे धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.

अर्ज मागे घेण्याची १० जून ही अंतिम तारीख आहे. शेकापचे परेश देशमुख हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यांनी सरपंचपदही भूषवलेले आहे. त्यामुळे शेकापच्याच मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ज्यांच्या पुढाकाराने चेंढरे परिवर्तन विकास आघाडी अस्तित्वात आली होती. ते दत्ता ढवळेच बाहेर पडल्याने आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार ढवळे यांनी बोलून दाखवल्याने राजकीय पेच चांगलाच वाढला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अजून राजकीय घडामोडी घडणार असल्याने राजकीय चुरस अनुभवास मिळणार आहे.

१० सरपंच आणि २६३ सदस्यपदासाठी होणार पोटनिवडणूकअलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायत, पेण तालुक्यातील रावे, पनवेल तालुक्यातील चावणे, जांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायत, उरण तालुक्यातील गोवठणे, आवरे ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील मुरु ड ७, पेण २२, पनवेल १९, उरण, कर्जत, खालापूर प्रत्येकी ५, रोहा ८, सुधागड, माणगाव, तळा प्रत्येकी १७, महाड ६२, पोलादपूर २९, श्रीवर्धन २८, म्हसळा २२ अशा २६३ ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक आहे.

शेकापमधून भाजपात प्रवेश केलेले परेश देशमुख यांनी अद्यापही शेकापच्या जिल्हा कार्यालयीन चिटणीसपदाचा तसेच आरडीसीसी बँकेसह अन्य महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिलेला नाही. तसेच शेकापनेही त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षासह अन्य महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी केलेली नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी चांगलीच चर्चा रंगली होती.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार अर्ज, सदस्य पदासाठी ५९ अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पाच अर्ज, सदस्य पदासाठी ५८ अर्ज दाखल करण्यात आले.