शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

बीएसएनएलची सेवा सहा महिन्यांपासून ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 04:54 IST

चौपदरीकरणाचा फटका : केबल तुटल्याने बँका, टपाल सेवेवर परिणाम

सिकंदर अनवारे

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र कामाचा महामार्गालगतच्या अनेक गावातील ग्रामपंचायती, बँका आणि पोस्ट खात्याच्या नेट सुविधेला फटका बसला आहे. याचे मूळ कारण नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत टाकण्यात आलेली ओ. एफ. सी. केबल होय.

सध्या महाड ते दासगाव या परिसरात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वारंवार बीएसएनएलची ओ. एफ. सी. केबल तुटत असून याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. गेले सहा महिने या भागातील इंटरनेट सेवा बंद असून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. बँका, टपाल सेवांची अनेक कामे आॅनलाइन झाल्याने इंटरनेट महत्त्वाचे ठरत असूनही दुर्लक्ष होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला वेग आला असून अनेक ठिकाणी वळण, वळणावरील डोंगर आणि मोºयांच्या कामासाठी ठेकेदार कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. या खोदकामामध्ये अनेक कंपन्यांनी टाकलेल्या इंटरनेट सेवेच्या केबल तुटत आहेत.

खोदकामाच्या वेळी इतर कंपन्यांचे अभियंते तसेच कर्मचारी हजर राहून तुटलेल्या केबल जोडण्याचे काम करत आहे. मात्र बीएसएनएल कंपनीचे तातडीने काम तर सोडाच तक्रारी येवून देखील कामांकडे दुर्लक्ष होत आहेत. त्यामुळे दासगाव विभागात गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएलची सेवा बंद पडली आहे. पूर्वी टाकण्यात आलेली केबल ही अनधिकृतपणे असून शासनाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यमार्गावर शासनाने ठरवून दिलेल्या अंतरावरूनच ही केबल टाक णे गरजेचे असते. ठेकेदार कंपनीकडून महामार्ग विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग खोदकाम कामामध्ये होणाºया नुकसानीची अनामत रक्कम भरून जेव्हा केबल टाकण्यासाठी परवानगी देते, मात्र त्यानंतर ठेकेदार कंपनी सर्वच नियम धाब्यावर बसून रस्त्याच्या साइडपट्टीचे खोदकाम करूनच केबल टाकण्याचे काम करते. त्याचाच फटका चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामामध्ये काही गावांना बसतो आहे. दासगाव, वीर, टोल, दाभोळ, वहूर अशा अनेक गावांच्या बीएसएनएल टेलिफोन आणि नेटसेवा सहा महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. परिणामी शासकीय खात्यातील बहुतांश कामकाज ठप्प आहेत. पर्याय म्हणून काही ठिकाणी खासगी कंपन्यांची इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.दुर्लक्ष करणाºयांवर कारवाईची मागणीच्चौपदरीकरणाच्या कामामध्ये इतर टेलिफोन कंपन्या तुटलेल्या ओएफसी केबल ज्या पद्धतीने रिपेअरिंगचे काम करत आहेत, त्याप्रकारे बीएसएनएल कंपनीचे अधिकारी काम करत नाही. बंद असलेल्या नेट सुविधेकडे वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून गैरसोय दूर करावी. कामात चालढकल करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून दासगाव ग्रा. पं.ची नेट सुविधा बंद आहे. ग्रा.पं. स्तरावरून होणाºया आॅनलाइन कामासाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे.- अजित पोलेकर, ग्रामसेवक, दासगावगेली सहा महिने पोस्ट आॅफिसचा टेलिफोन बंद आहे, तर त्या सोबत बीएसएनएलची नेट सुविधाही बंद आहे. सध्या दुसºया खासगी कंपनीचे नेट वापरत आहोत. त्याचीही रेंज नेहमी जात असते. अशावेळी काम ठप्प होवून खेड्यापाड्यातील येणाºया नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.- एम. एम. रोडगे, दासगाव, पोस्ट मास्तरबीएसएनएलचे जिल्हा मॅनेजर सी. व्ही. राव यांच्याकडे संपर्क साधला असता नेट सेवा बंद असल्याचे कारण ठेकेदाराकडून चौपदरीकरणाच्या होणाºया कामात वारंवार केबल तोडण्याचे काम होत असल्याचे सांगत इतर इतर प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.

टॅग्स :RaigadरायगडBSNLबीएसएनएल