शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
4
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
5
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
6
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
7
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
9
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
10
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
11
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
12
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
13
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
14
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
15
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
16
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
17
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
18
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
19
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
20
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांमुळे माणसे वाचणेही शिकलो, रायगड जिल्हा ग्रंथोत्सवात परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:31 IST

अलिबाग : पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसºयाला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते. हे केवळ वाचनातून शक्य होते.

अलिबाग : पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसºयाला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते. हे केवळ वाचनातून शक्य होते. त्यामुळेच पुस्तक वाचता वाचता माणसेही वाचायला शिकलो, ज्याचा फायदा मला जिल्हाधिकारी म्हणून काम करताना होतो अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.जिल्हा ग्रंथोत्सवाच्या कार्यक्र मात गुरुवारी सकाळी जेएसएम महाविद्यालयात ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी विचार व्यक्त केले. या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी उपस्थित होते.या परिसंवादात जिल्हा कोषागार अधिकारी मुल्ला म्हणाले की, शासनाचे काम करताना विविध नियमांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी वाचनाची सवय ही कामी येते. चांगलं वाचन आवश्यक असून वाचनाने आपला दृष्टिकोन बदलतो. आपले विचार अधिक व्यापक झाले. वाचनाने माझी दृष्टी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक झाली. माझा सामाजिक आणि आर्थिक स्तर केवळ वाचनामुळेच वाढला. माझ्या कुटुंबाला असलेला व्यसनाधीनतेचा शापही मी वाचनामुळेच मोडीत काढू शकलो.अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी वाचनाचा संस्कार आवश्यक आहे. वाचनामुळे माझा धर्म आणि धार्मिकता याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे मला पोलीस विभागात काम करताना मदत होते, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालक सुधीर शेठ यांचा महाड येथे राबविण्यात येत असलेल्या पुस्तक बाग उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लहानपणी वडिलांमुळे वाचनाचा संस्कार घडला. ‘मृत्युंजय’ हा पहिला ग्रंथ वाचून मी भारावून गेलो. त्यासाठी लेखक शिवाजी सावंत यांना पत्रही लिहिले. त्यांनीही मला उत्तर दिले. ते पत्र मी जपून ठेवले आहे. पुढे अधिकारी झाल्यावर मला शिवाजी सावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना ते पत्र दाखवले. आपल्या आयुष्यात शिवाजी सावंत आणि कुसुमाग्रज यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक हाच अनमोल ठेवा आहे.विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र वाटपयाच कार्यक्र मात वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्रे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड