शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पुस्तकांमुळे माणसे वाचणेही शिकलो, रायगड जिल्हा ग्रंथोत्सवात परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:31 IST

अलिबाग : पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसºयाला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते. हे केवळ वाचनातून शक्य होते.

अलिबाग : पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसºयाला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते. हे केवळ वाचनातून शक्य होते. त्यामुळेच पुस्तक वाचता वाचता माणसेही वाचायला शिकलो, ज्याचा फायदा मला जिल्हाधिकारी म्हणून काम करताना होतो अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.जिल्हा ग्रंथोत्सवाच्या कार्यक्र मात गुरुवारी सकाळी जेएसएम महाविद्यालयात ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी विचार व्यक्त केले. या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी उपस्थित होते.या परिसंवादात जिल्हा कोषागार अधिकारी मुल्ला म्हणाले की, शासनाचे काम करताना विविध नियमांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी वाचनाची सवय ही कामी येते. चांगलं वाचन आवश्यक असून वाचनाने आपला दृष्टिकोन बदलतो. आपले विचार अधिक व्यापक झाले. वाचनाने माझी दृष्टी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक झाली. माझा सामाजिक आणि आर्थिक स्तर केवळ वाचनामुळेच वाढला. माझ्या कुटुंबाला असलेला व्यसनाधीनतेचा शापही मी वाचनामुळेच मोडीत काढू शकलो.अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी वाचनाचा संस्कार आवश्यक आहे. वाचनामुळे माझा धर्म आणि धार्मिकता याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे मला पोलीस विभागात काम करताना मदत होते, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालक सुधीर शेठ यांचा महाड येथे राबविण्यात येत असलेल्या पुस्तक बाग उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लहानपणी वडिलांमुळे वाचनाचा संस्कार घडला. ‘मृत्युंजय’ हा पहिला ग्रंथ वाचून मी भारावून गेलो. त्यासाठी लेखक शिवाजी सावंत यांना पत्रही लिहिले. त्यांनीही मला उत्तर दिले. ते पत्र मी जपून ठेवले आहे. पुढे अधिकारी झाल्यावर मला शिवाजी सावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना ते पत्र दाखवले. आपल्या आयुष्यात शिवाजी सावंत आणि कुसुमाग्रज यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक हाच अनमोल ठेवा आहे.विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र वाटपयाच कार्यक्र मात वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्रे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड