शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सत्संगातून स्वच्छता अभियान; प्रेम, शांती आणि समतेचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:20 IST

संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत.

गिरीश गोरेगावकरमाणगाव : संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. या मानवी मूल्यांना बळकटी देण्यासाठी १९२९मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना झाली. आरोग्यास घातक असणाºया अस्वच्छता आणि कचरा या समस्येच्या निर्मूलनाकरिता संत निरंकारी मंडळ गेली अनेक वर्षे भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर २८ देशांमध्ये अध्यात्मिक शिकवणीतून स्वच्छतेचा नारा देत आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षलागवड असे विविध उपक्रम राबवित आहेत. मंडळाचे भक्तगणही अनेक उपक्रम आपापल्या तालुका शाखेतून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असतात.माणगाव तालुक्यात तालुका मुखी राम टेंबे, प्रचारक अनिल पवार, पारुनाथ मुंडे यांनी स्वच्छतेवर भर देत संपूर्ण तालुक्यात स्वच्छता अभियान राबवून अनेक गावे कचरामुक्त केली आहेत. सार्वजनिक ठिकाणे बस स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, रस्ते, वाड्या-वस्त्या येथे वेळोवेळी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येते. तालुक्यात स्वच्छतेची कामे करण्याकरिता तालुका शाखेकडून प्रत्येक गावात भक्तगणांचे सेवादल स्थापन करण्यात आले आहे. या सेवादलाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येते.२६३ शहरी रेल्वेस्थानकांची नियमित स्वच्छतादेशभरात एकूण २६३ शहरी रेल्वेस्थानके नियमितपणे स्वच्छ केली जातात. यामध्ये प्लॅटफॉर्म, मुख्य प्रवेशद्वार, वाहतूक तळ, तिकीटघर, स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. याला अनुसरून माणगाव रेल्वेस्थानकही नियमित स्वच्छ करण्याचे नियोजनही मंडळाच्या माणगाव तालुका शाखेने केले आहे.

टॅग्स :RaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान