शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

'संभाजी ब्रिगेडने तलवारीसह आता लेखणी हातात घ्यावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:39 IST

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन; दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता

अलिबाग : बहुजनांच्या कायम पाठीशी असणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे काम हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित आहे. देशातील, राज्यातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तलवारीसह आता लेखणी घेऊन काम करण्याचे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात दोन दिवस संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू होते. रविवारी सायंकाळी अधिवेशनाची सांगता झाली. त्यापूर्वी ते बोलत होते. जी संघटना, जो समाज बहुजनांचा विचार करतो, त्यांच्या पाठीशी महाराजांचा आशीर्वाद कायमच राहणार आहे. प्रवीण गायकवाड यांच्या रूपाने बहुजनांचे हित साधणारा नेता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मिळाला आहे. बहुजन समाजाला एकत्र आणण्याची तळमळ प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये आहे. संभाजी ब्रिगेडच्या ताकदीचा डंका सर्वदूर वाजला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.दोन दिवस पार पडलेल्या अधिवेशनातून चांगला विचार घेऊन संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जातील, परंतु आता खरी त्यांची जबाबदारी वाढली आहे. अधिवेशनात शिकवलेल्या धड्याचा उपयोग त्यांनी सामाजिक कार्यात करणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजातील सर्व बहुजन समाजाला त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचेही खासदार संभाजी राजे यांनी सांगितले. गड-किल्ल्याचे संवर्धन करताना तेथील गावांचाही विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. सध्याचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. युवा शक्ती घडवण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुरू आहे.संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आधी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. समाजकारणातून राजकारण करताना दृष्टी प्रगल्भ ठेवावी, असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. अधिवेशनामध्ये आर्थिक सक्षमीकरण, कृषी उद्योगातील संधी, दहशतवादाचे बदलते स्वरूप, भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, सनातन संस्था व समाज सुधारकांच्या झालेल्या हत्या, मोर्चा पे चर्चा, मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणापुढील समस्या, समाजकारण, राजकारणातील वर्तमान स्थिती, प्रसार माध्यमे व सोशल मीडियाचे महत्त्व आदी विषयांवर चर्चा झाली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रवक्ते श्रीमंत कोकाटे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शांताराम कुंजीर हे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती