शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांबरकुंड धरण २०२२ पर्यंत पूर्ण होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:34 IST

जलसंपदा विभागाकडून पुन्हा हालचाली सुरू : ३६ वर्षे प्रकल्प रखडला; लवकरच त्रुटींची पूर्तता

- जयंत धुळप अलिबाग : तालुक्याचा कायापालट करू शकणाऱ्या, मात्र तरीही गेल्या ३६ वर्षांपासून रखडलेल्या सांबरकुंड धरणाच्या कामाला आता नव्याने चालना मिळणार आहे. केंद्रीय जल आयोगाची मान्यता, तांत्रिक समितीने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता, पर्यावरण खात्याची मान्यता वेळेत मिळाल्यास या प्रकल्पाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने दिले आहे.प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च ११.७१ कोटी रुपये होता, ३६ वर्षांच्या विलंबामुळे तो २०१२-१३ मध्ये ३३५.९२ कोटी रुपयांवर गेला आहे. प्रकल्पासाठी येणारा अंदाजित खर्च वाढणार असल्याने सुधारित पाचव्या प्रशासकीय अंदाजपत्रकास मान्यता मिळविण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. मूळ प्रशासकीय मान्यता २८ सप्टेंबर १९८२ मध्ये ११.७१ कोटीची देण्यात आली होती. आता नव्याने प्रकल्पावर जलसंपदा विभाग काम करीत आहे. सर्व संबंधित परवानग्या आणि आवश्यक भूमिसंपादन नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे लेखी उत्तर अलिबागचे आमदार पंडित पाटील यांना राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहे.सांबरकुंड धरण प्रकल्पाचे लाभक्षेत्र २९२७ हेक्टर असल्याने प्रकल्पाने अलिबाग तालुका सुजलाम-सुफलाम होणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच बारमाही शेती, बागायती, लघुउद्योग यांच्यासाठी धरणातील पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यांचे परिवर्तन घडू शकते, असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. नवीन भूसंपादन कायद्यानुसार, मोबदला देण्यात यावा ही प्रमुख मागणी येथील प्रकल्पग्रस्तांची आहे. धरण प्रकल्पासाठी २७५ हेक्टर जमीन लागणार असून या जमिनीच्या भूसंपादनाची किंमत चालू बाजारभावाप्रमाणे कोट्यवधीच्या घरात जाणार आहे.शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपयांचे वाटपधरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी खासगी जमिनीतील १०३.८१ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी २०१३ मध्ये ४.१२ कोटी रुपये महसूल यंत्रणेस देण्यात आले आहेत. तर मार्च २०१६ मध्ये धरणास मान्यता दर्शविलेल्या प्रकल्पबाधित शेतकºयांना भूसंपादन कायदा २०१३ नुसार ३३ कोटी रु पयांचे वाटप करण्यात आले आहे.जांभूळवाडी, सांबरकुंडवाडी व खैरवाडी या तीन गावांचे पुनर्वसन रामराज येथील राजेवाडी येथे करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक २८ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. प्रकल्पबाधित गावांमधील २०८ एकूण कुटुंबांची पंचवीस वर्षांपूर्वी लोकसंख्या १०२७ होती, त्यामध्ये आता तिप्पट वाढ झाली आहे. परिणामी ३६ वर्षांपूर्वीच्या समस्यांमध्ये आता वाढ झाली असून या सर्व समस्यांतून मार्ग काढून हे धरण बांधण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागापुढे आहे.प्रशासकीय मान्यता व आर्थिक बाजूमूळ मान्यता११.७१ कोटीदुसरी सुधारित मान्यता२९.७१ कोटीतिसरी सुधारित मान्यता५0.४0 कोटीचौथे प्रस्तावित दरपत्रक३३५.९२ कोटीसांबरकुंड धरण-आवश्यक जमीनबुडीत क्षेत्र२२८.४० हेक्टरकालव्यासाठी जमीन४६.६० हेक्टरसिंचनाचे लाभक्षेत्र२९२७ हेक्टरमोबदला वाटप३३ कोटी रु पये

टॅग्स :Raigadरायगड