शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:45 IST

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.दिघी गावाजवळच जंजिरा किल्ला आहे. विविध राज्यांतून पर्यटक जंजिरा बघण्यासाठी येतात. श्रीवर्धन-दिघीअंतर ३० कि.मी.चे आहे. जे पर्यटक श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, दिवेआगार स्थित मंदिराच्या भेटीसाठी येतात ते आवर्जून जंजिरा किल्ल्याला भेट देतात. दिघीपासून जलवाहतुकीची सोय उपलब्ध असल्याने अवघ्या २० मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे पर्यटक श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, गोनघरफाटा मार्गे कुडगाव ते दिघी प्रवास करणे पसंत करतात; परंतु आजमितीस या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पुणे, मुंबईमधील पर्यटक रविवार सुट्टीसाठी श्रीवर्धनची निवड करतात. पुणे ते ताम्हणी, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १६८ कि.मी.चे अंतर आहे. मुंबई, पनवेल, पेण, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १९८ कि.मी.चे अंतर आहे. साधारणत: पाच तासांत पर्यटक श्रीवर्धनमध्ये पोहोचतात. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत खड्डेमुरुड, अलिबाग, पेण, रेवदंडा स्थित श्रीवर्धनमधील रहिवाशांना समुद्रमार्गे दिघीत आल्यानंतर दिघी ते श्रीवर्धन रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रचंड त्रास होत आहे. हे ३० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तास लागत असल्याने श्रीवर्धनमधील नागरिक तसेच बाहेरून येणारे प्रवासी, पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला गाडी चालवताना असंख्य अडचणी येत आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ करण्यात आला. माणगाव ते वडवली गावाच्या हद्दीपर्यंत महामार्गाचे काम आले आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास कधी जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत कमीत कमी आहे त्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडेल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.वेळास ते दिघी रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्व स्थानिकांना त्रास होत आहे. आम्ही माणगाव, श्रीवर्धनमधील बांधकाम विभागाला त्या विषयी कळवले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीच उत्तर आले नाही, तसेच दिघी पोर्टला खड्डे बुजविण्यासाठी कळवले आहे. स्थानिक जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.- मधुकर भालदार,ग्रामसेवक,दिघी ग्रामपंचायतदिघी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या मार्गावरून प्रवासी वाहतूक नियमित चालते. रस्ता खराब असल्याने त्याचा परिणाम बसच्या क्षमतेवर होत आहे.- राजेंद्र बडे, एसटीचालक,श्रीवर्धन आगारमी प्रत्येक आठवडासुट्टीला माझी दुचाकी घेऊन मुरुडला गावी जातो. वेळास ते दिघी रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, वेळीच रस्त्याचे काम केले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.- संदीप गुरव, रहिवासी, मुरुडदिघी हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, त्यामुळे तो आमच्या अखत्यारित येत नाही.- श्रीकांत गणगणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड