शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:45 AM

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

- संतोष सापतेश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला आहे. पर्यटनस्थळाच्या विकासासाठी रस्ते हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, दिघी ते श्रीवर्धन रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे निदर्शनास येत आहे.दिघी गावाजवळच जंजिरा किल्ला आहे. विविध राज्यांतून पर्यटक जंजिरा बघण्यासाठी येतात. श्रीवर्धन-दिघीअंतर ३० कि.मी.चे आहे. जे पर्यटक श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर, दिवेआगार स्थित मंदिराच्या भेटीसाठी येतात ते आवर्जून जंजिरा किल्ल्याला भेट देतात. दिघीपासून जलवाहतुकीची सोय उपलब्ध असल्याने अवघ्या २० मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे पर्यटक श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, गोनघरफाटा मार्गे कुडगाव ते दिघी प्रवास करणे पसंत करतात; परंतु आजमितीस या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पुणे, मुंबईमधील पर्यटक रविवार सुट्टीसाठी श्रीवर्धनची निवड करतात. पुणे ते ताम्हणी, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १६८ कि.मी.चे अंतर आहे. मुंबई, पनवेल, पेण, माणगाव, साई मार्गे श्रीवर्धन १९८ कि.मी.चे अंतर आहे. साधारणत: पाच तासांत पर्यटक श्रीवर्धनमध्ये पोहोचतात. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत खड्डेमुरुड, अलिबाग, पेण, रेवदंडा स्थित श्रीवर्धनमधील रहिवाशांना समुद्रमार्गे दिघीत आल्यानंतर दिघी ते श्रीवर्धन रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रचंड त्रास होत आहे. हे ३० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड तास लागत असल्याने श्रीवर्धनमधील नागरिक तसेच बाहेरून येणारे प्रवासी, पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. वेळास, कुडगाव, दिघी गावांच्या हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वाराला गाडी चालवताना असंख्य अडचणी येत आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ठ करण्यात आला. माणगाव ते वडवली गावाच्या हद्दीपर्यंत महामार्गाचे काम आले आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास कधी जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत कमीत कमी आहे त्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, जेणेकरून प्रवासी वाहतूक सुरळीत पार पडेल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.वेळास ते दिघी रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्व स्थानिकांना त्रास होत आहे. आम्ही माणगाव, श्रीवर्धनमधील बांधकाम विभागाला त्या विषयी कळवले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप काहीच उत्तर आले नाही, तसेच दिघी पोर्टला खड्डे बुजविण्यासाठी कळवले आहे. स्थानिक जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.- मधुकर भालदार,ग्रामसेवक,दिघी ग्रामपंचायतदिघी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या मार्गावरून प्रवासी वाहतूक नियमित चालते. रस्ता खराब असल्याने त्याचा परिणाम बसच्या क्षमतेवर होत आहे.- राजेंद्र बडे, एसटीचालक,श्रीवर्धन आगारमी प्रत्येक आठवडासुट्टीला माझी दुचाकी घेऊन मुरुडला गावी जातो. वेळास ते दिघी रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, वेळीच रस्त्याचे काम केले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.- संदीप गुरव, रहिवासी, मुरुडदिघी हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे, त्यामुळे तो आमच्या अखत्यारित येत नाही.- श्रीकांत गणगणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड