शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

बारा कोटींचा निधी मिळूनही रस्त्याची दैना

By admin | Updated: April 30, 2017 03:43 IST

अलिबाग-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याअंती

अलिबाग : अलिबाग-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याअंती राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कार्यादेश काढण्यास दिरंगाई झाली. त्याचा नाहक त्रास या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांना घेराव घालून जाब विचारला.शनिवारी शेकापचे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. परिणामी, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग पुरता हादरून गेला आहे. दरम्यान, अभियंता व्ही. बी. पाटील यांनी शुक्रवारी सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग-रेवस रस्त्याचे काम सत्वर सुरू करणार, असे लेखिपत्र दिले तर येत्या ३ मेपर्यंत कार्यादेश काढण्यात येणार असून १५ मेपर्यंत रस्त्याचे काम सुरू होईल, अशी लेखी हमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. एस. देशपांडे यांनी शनिवारी दिलीप भोईर यांना दिली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. अलिबाग-रेवस हा २२ कि.मी. मार्गावरील रस्ता गेली काही वर्षे खड्ड्यांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अलिबाग-रेवस आणि कनकेश्वर-कार्लेखिंड या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी अलिबाग-रेवस रस्त्यावर आरसीएफ गेटसमोर रास्ता रोको आंदोलन पुकारले. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तथा विक्र म मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ९:३० वाजल्यापासून सारळ पूल, मांडवा दस्तुरी, झिराड नाका आणि आर.सी.एफ.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता अडविण्यात आला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, नितीन राऊत, दीपक म्हात्रे, तसेच रिक्षाचालकांसह स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले. तातडीने रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, दर्जा राखावा, अशी मागणी होत होती. या वेळी अलिबाग-रेवस मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. (विशेष प्रतिनिधी)रस्त्याचे काम १५ मेनंतर- सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देशपांडे घटनास्थळी आले. रस्त्याचे काम १५ मे नंतर करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्यांना धारेवर धरले. - अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ पुलापासूनच आंदोलनाला सुरूवात झाली होती. ठिकठिकाणी वाहने अडविण्यात येत होती. जवळपास दीड ते पावणेदोन तास वाहतूककोंडी झाली होती.