शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन

By राजेश भोस्तेकर | Updated: November 1, 2022 16:36 IST

अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन आठ दिवसात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग : ...

अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन

आठ दिवसात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : अलिबाग रोहा या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडून वर्ष लोटले तरी काम अपूर्णच राहिले आहे. रस्त्याच्या खड्डेमय परिस्थिती विरोधात बेलकडे येथे काँग्रेस सेवा फाउंडेशन, रस्ते ऍक्टिव्हिस्ट यांच्यामार्फत मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे रस्ता रोको आंदोलन पुकारले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाची दखल घेत आठ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे उप अभियंता राजीव डोंगरे यांनी दिले आहे. ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे आता आठ दिवसानंतर तरी रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागेल अशी आशा प्रवाशी मनात बाळगून आहेत. 

अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष भास्कर चव्हाण, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड.उमेश मधुकर ठाकूर, युवा नेते अमीर उर्फ पिंट्या ठाकूर, रस्ते ऍक्टिव्हिस्ट दिलीप जोग, ऍड. अजय उपाध्ये, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते एस.एम.पाटील, संदीप गोठीवरेकर, मैनुद्दीन चौधरी ऊर्फ मोदीभाई, आदी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. 

अलिबाग-बेलकडे वावे-रोहा मुख्य रस्त्याचे काम ठेकेदारास पावणे दोनशे कोटी कामाचा कार्यारंभ आदेश मिळून ४ वर्ष झाल्यावरही सुरू झाले नाही आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येण्याचे आश्वासन देऊन एक वर्ष पुरे झाले. मात्र रस्ता जैसे थे आहे. खड्डेमय रस्त्यानेच प्रवाशांना आजही प्रवास करावा लागत आहे. जनतेच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस सेवा फाउंडेशन व तर्फे अलिबाग-बेलकडे वावे-रोहा मुख्य रस्त्याचे काम त्वरित चालू व्हावे यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे रस्त्यावरील एक तास वाहतूक खोळंबली होती.

प्रवाशांना नाहक त्रास

सद्य:स्थितीत हा रस्ता खड्डेमय झाला आहे. पर्यायाने धुळीचे साम्राज्यही झाले आहे. सर्वसामान्य नागरीकांना गेली अनेक वर्ष या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळेच गेली अनेक वर्ष या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. शिक्षण आणि रोजगार या दोन महत्तम उद्देशाने बस, सितारा, रिक्षा, मोटारसायकल अश्या दुचाकी- तीनचाकी-चारचाकी वाहनांच्या सहाय्याने प्रवास करणारे अनेक नागरीक आहेत. यातही विद्यार्थी आणि जेष्ठ यांची संख्या अधिक आहे असे काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.

नारळ फोडा पण रस्ता करा

अलिबाग रोहा रस्त्याच्या कामाचा नारळ अनेक राजकीय नेत्यांनी फोडले आहेत. मात्र अद्यापही हा रस्ता खड्डेमयच राहिला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी यावेळीही दोन डझन नारळ आणले होते, ज्या नेत्यांना या रस्त्याचे नारळ वाढवायचे असतील त्यांनी हवे तेवढे नारळ वाढवावे पण हा रस्ता एकदाचा पुरा करावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.