शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रॅली

By admin | Updated: January 14, 2017 06:52 IST

कर्जत मधील अभिनव ज्ञानमंदिर मैदानावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये राष्ट्रीय

कर्जत : कर्जत मधील अभिनव ज्ञानमंदिर मैदानावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूल कर्जत आणि कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या रॅली मध्ये चारशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ‘दुख:द अपघात सुखद सुरक्षा’ असे या कार्यक्र माचे घोषवाक्य होते.विद्यार्थ्यांच्या या जनजागृती रॅलीचे उपविभागीय पोलीचे अधिकारी जालींधर नारकुल यांच्या हस्ते कार्यक्र माचे उद्घाटन झाले. या प्रसंगी पोलीस निरिक्षक नजमुद्दीन मुल्ला, मोटार वाहन निरिक्षक उदय इंगळे, हरिभाऊ जेजुरकर, नगराध्यक्षा रजनी गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नायब तहसीलदार लक्ष्मण खटके आदी उपस्थित होते. त्यानंतर रॅली कर्जत शहरातून कोंकण ज्ञानपीठ शिक्षण संकुलाकडे आली. अभियांत्रिकी महाविद्यालायाच्या सेमिनार हॉल मध्ये रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात रस्त्यावरून सुरिक्षत वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच निष्काळजीणाने वाहन चालविण्यास होणारी हानी याबाबत माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे खिजनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, उपप्राचार्य राजकुमार नारखेडे आदी पोलीस निरिक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत आणि रस्ता अपघात टाळावा असे सांगितले. विनय मोरे यांनी आपल्या अनुभवी व्याख्यानातून कोणतेही वाहन चालवितांना मोबाईल वरून बोलू नये. चारचाकी वाहन चालवितांना पाण्याच्या बाटल्या, बॅगा आदी सामान खाली ठेऊ नका अगर खाली पडू देऊ नका कारण त्यामुळे ब्रेक दाबताना अडचण येऊ शकते व अपघात होऊ शकतो. असे स्पष्ट करून दृकश्राव पद्धतीने सचित्र माहिती दिली. विवेक भागवत यांनी सूत्रसंचालन तर निलेश मराठे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी प्रा. एस. एम. पाटील, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. परवीन जगताप, प्रा. प्रियांका पाटील, प्रा. निलोफर खान प्रा. रु पाली येवले यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)