शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:10 IST

१३ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर; भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून लवकरच पाहणी

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावाच्या वरील बाजूस असलेल्या दुर्गम अशा सह्याद्रीवाडी या धनगरवस्तीत जमिनीला भेग पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून, ग्रामस्थांनी आपली घरे सोडून डोंगराखाली स्थलांतर केले आहे. त्यांच्या वाडीवरील काही ग्रामस्थांची घरे आंबेशिवथर गावाजवळ असल्याने या पाच घरात सह्याद्रीवाडीवरील जवळपास १३ कुटुंबे एकत्रित राहत आहेत.महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावापासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर सह्याद्रीवाडी (धनगरवाडी) वसाहत आहे. गेली दीडशे वर्षे हे लोक या ठिकाणी राहत असून, याठिकाणी १३ घरे आहेत. गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसाने जमिनीला भेगा पडल्याचे दिसून आले. या वाडीवर घरांपासून जवळपास साधारण ३० फूट अंतरावर जमिनीला तडे गेले आहेत. यामुळे जमीन खचते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. पावसाची संततधार आणि जमिनीला पडलेल्या भेगा पाहून स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. आंबेशिवथर गावाजवळ सह्याद्रीवाडीवरील काही लोकांनी दोन वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी सध्या हे ग्रामस्थ रहात आहेत.भेगा पडून जमीन खचल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांना कळताच त्यांनी त्वरित सह्याद्रीवाडी, आंबेशिवथर, पारमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सपना मालुसरे, गटविकास अधिकारी मंडलिक, विस्तार अधिकारी वाघमोडे, माजी सरपंच सुभाष मालुसरे, आंबेशिवथरचे सरपंच विठ्ठल मालुसरे यांनी वाडीतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून भविष्यात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थ्यांची डोंगरावरून पायपीटआंबेशिवथर गावापासून दोन किमी अंतरावर डोंगरात वसलेल्या सह्याद्रीवाडीत सुमारे पंधरा घरे असून ७८ ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या राहात आहेत.जवळपास २२ विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागते, तर काही ग्रामस्थ माणगाव आणि गोरेगाव येथे मजुरीसाठी जातात. सह्याद्रीवाडीत रस्ता, पिण्याचे पाणी, अशा मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ हलाखीचे जीवन जगत आहेत.सद्यस्थितीत सह्याद्रीवाडीतील सर्व ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था मंदिर आणि शाळांतून करण्यात आली आहे. परिसराची पाहणी भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून होईपर्यंत ग्रामस्थांचा मुक्काम येथेच राहील.- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार,महाड

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगड