शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:10 IST

१३ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर; भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून लवकरच पाहणी

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावाच्या वरील बाजूस असलेल्या दुर्गम अशा सह्याद्रीवाडी या धनगरवस्तीत जमिनीला भेग पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून, ग्रामस्थांनी आपली घरे सोडून डोंगराखाली स्थलांतर केले आहे. त्यांच्या वाडीवरील काही ग्रामस्थांची घरे आंबेशिवथर गावाजवळ असल्याने या पाच घरात सह्याद्रीवाडीवरील जवळपास १३ कुटुंबे एकत्रित राहत आहेत.महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावापासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर सह्याद्रीवाडी (धनगरवाडी) वसाहत आहे. गेली दीडशे वर्षे हे लोक या ठिकाणी राहत असून, याठिकाणी १३ घरे आहेत. गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसाने जमिनीला भेगा पडल्याचे दिसून आले. या वाडीवर घरांपासून जवळपास साधारण ३० फूट अंतरावर जमिनीला तडे गेले आहेत. यामुळे जमीन खचते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. पावसाची संततधार आणि जमिनीला पडलेल्या भेगा पाहून स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. आंबेशिवथर गावाजवळ सह्याद्रीवाडीवरील काही लोकांनी दोन वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी सध्या हे ग्रामस्थ रहात आहेत.भेगा पडून जमीन खचल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांना कळताच त्यांनी त्वरित सह्याद्रीवाडी, आंबेशिवथर, पारमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सपना मालुसरे, गटविकास अधिकारी मंडलिक, विस्तार अधिकारी वाघमोडे, माजी सरपंच सुभाष मालुसरे, आंबेशिवथरचे सरपंच विठ्ठल मालुसरे यांनी वाडीतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून भविष्यात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थ्यांची डोंगरावरून पायपीटआंबेशिवथर गावापासून दोन किमी अंतरावर डोंगरात वसलेल्या सह्याद्रीवाडीत सुमारे पंधरा घरे असून ७८ ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या राहात आहेत.जवळपास २२ विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागते, तर काही ग्रामस्थ माणगाव आणि गोरेगाव येथे मजुरीसाठी जातात. सह्याद्रीवाडीत रस्ता, पिण्याचे पाणी, अशा मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ हलाखीचे जीवन जगत आहेत.सद्यस्थितीत सह्याद्रीवाडीतील सर्व ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था मंदिर आणि शाळांतून करण्यात आली आहे. परिसराची पाहणी भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून होईपर्यंत ग्रामस्थांचा मुक्काम येथेच राहील.- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार,महाड

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगड