शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:10 IST

१३ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर; भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून लवकरच पाहणी

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावाच्या वरील बाजूस असलेल्या दुर्गम अशा सह्याद्रीवाडी या धनगरवस्तीत जमिनीला भेग पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून, ग्रामस्थांनी आपली घरे सोडून डोंगराखाली स्थलांतर केले आहे. त्यांच्या वाडीवरील काही ग्रामस्थांची घरे आंबेशिवथर गावाजवळ असल्याने या पाच घरात सह्याद्रीवाडीवरील जवळपास १३ कुटुंबे एकत्रित राहत आहेत.महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावापासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर सह्याद्रीवाडी (धनगरवाडी) वसाहत आहे. गेली दीडशे वर्षे हे लोक या ठिकाणी राहत असून, याठिकाणी १३ घरे आहेत. गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसाने जमिनीला भेगा पडल्याचे दिसून आले. या वाडीवर घरांपासून जवळपास साधारण ३० फूट अंतरावर जमिनीला तडे गेले आहेत. यामुळे जमीन खचते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. पावसाची संततधार आणि जमिनीला पडलेल्या भेगा पाहून स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. आंबेशिवथर गावाजवळ सह्याद्रीवाडीवरील काही लोकांनी दोन वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी सध्या हे ग्रामस्थ रहात आहेत.भेगा पडून जमीन खचल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांना कळताच त्यांनी त्वरित सह्याद्रीवाडी, आंबेशिवथर, पारमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सपना मालुसरे, गटविकास अधिकारी मंडलिक, विस्तार अधिकारी वाघमोडे, माजी सरपंच सुभाष मालुसरे, आंबेशिवथरचे सरपंच विठ्ठल मालुसरे यांनी वाडीतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून भविष्यात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थ्यांची डोंगरावरून पायपीटआंबेशिवथर गावापासून दोन किमी अंतरावर डोंगरात वसलेल्या सह्याद्रीवाडीत सुमारे पंधरा घरे असून ७८ ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या राहात आहेत.जवळपास २२ विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागते, तर काही ग्रामस्थ माणगाव आणि गोरेगाव येथे मजुरीसाठी जातात. सह्याद्रीवाडीत रस्ता, पिण्याचे पाणी, अशा मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ हलाखीचे जीवन जगत आहेत.सद्यस्थितीत सह्याद्रीवाडीतील सर्व ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था मंदिर आणि शाळांतून करण्यात आली आहे. परिसराची पाहणी भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून होईपर्यंत ग्रामस्थांचा मुक्काम येथेच राहील.- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार,महाड

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगड