शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

भात पिकावर करपा, खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:26 IST

कृषी विभाग मात्र सुस्तच; खरीप हंगामातील ९३ टक्के पर्जन्यमान पूर्ण

- जयंत धुळप अलिबाग : सध्या भात पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. दाणा भरण्याच्या काळात पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच जिल्ह्यात भातावर करपा आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्याने अखेरच्या टप्प्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.वाढते ऊन आणि आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमिनीत हळव्या भात जातीच्या पिकांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाड-पोलादपूरसह जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांत भात पिकावर करपा आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, कृषी विभागाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याची माहिती महाड तालुक्यातील जिते गावातील प्रयोगशील शेतकरी मारुती कळंबे यांनी दिली आहे. जे शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात त्याच्याकडे कृषी विभागाचा माणूस पोहोचतो; परंतु प्रत्यक्षात सर्व भातशेतीचे सर्वेक्षण करण्याचे काम कृषी विभागाने करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.पावसाची उघडीप असल्याने उपलब्धतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाढते उन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमिनीत हळव्या जातीच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने अळी आढळल्यास दिलेल्या शिफारसीप्रमाणे फवारणी करावी. तसेच भातावर किंवा भाजीपाला व इतर पिकावर फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. लष्करी अळीचा उपद्रव भात पीककाढणीच्या वेळी होत असून त्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.तुडतुड्यांचाही प्रादुर्भावमादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी, भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते. अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत आणि भात पिकाचे नुकसान होते.या व्यतिरिक्त निळ्या भुंग्याचा देखील प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती अलिबाग येथील शेतकरी वसंत म्हात्रे यांनी दिली. कृषी विभागाच्या माध्यमातून किडीच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.यंदाच्या खरीप हंगामातील ९३ टक्के पर्जन्यमान मंगळवारी पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. त्यापैकी ९३.७३ टक्के म्हणजे ४७ हजार १२९ मि.मी. पर्जन्यमान मंगळवारी सकाळी ८ वाजता पूर्ण झाले.पाली येथे सर्वात कमी ४८ टक्के पर्जन्यमानदरम्यान, म्हसळा येथे १०६ टक्के, पेण येथे १०५ टक्के, उरण येथे १०१ टक्के, माणगाव व तळा येथे १०२ टक्के, गिरिस्थान माथेरान येथे १५७ टक्के, कर्जत ९८ टक्के, महाड येथे ९७ टक्के, अलिबाग येथे ९६ टक्के, पनवेल येथे ९४ टक्के, रोहा येथे ८७ टक्के, पोलादपूर येथे ८३ टक्के, मुरुड व खालापूर येथे ८२ टक्के, श्रीवर्धन येथे ६८ टक्के, सुधागड-पाली येथे ४८ टक्के पर्जन्यमान झाले आहे.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात माहितीचा अभावजिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे, त्यातच करपा आणि खोडकिड्यांचा प्रादुर्भाव बहुतेक सर्व तालुक्यांत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या कार्यालयातून भात पीक वस्तुस्थिती संदर्भात माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड