शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

भात पिकावर करपा, खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:26 IST

कृषी विभाग मात्र सुस्तच; खरीप हंगामातील ९३ टक्के पर्जन्यमान पूर्ण

- जयंत धुळप अलिबाग : सध्या भात पीक पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहे. दाणा भरण्याच्या काळात पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच जिल्ह्यात भातावर करपा आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्याने अखेरच्या टप्प्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.वाढते ऊन आणि आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमिनीत हळव्या भात जातीच्या पिकांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाड-पोलादपूरसह जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांत भात पिकावर करपा आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, कृषी विभागाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याची माहिती महाड तालुक्यातील जिते गावातील प्रयोगशील शेतकरी मारुती कळंबे यांनी दिली आहे. जे शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात त्याच्याकडे कृषी विभागाचा माणूस पोहोचतो; परंतु प्रत्यक्षात सर्व भातशेतीचे सर्वेक्षण करण्याचे काम कृषी विभागाने करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.पावसाची उघडीप असल्याने उपलब्धतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाढते उन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस व उतार जमिनीत हळव्या जातीच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने अळी आढळल्यास दिलेल्या शिफारसीप्रमाणे फवारणी करावी. तसेच भातावर किंवा भाजीपाला व इतर पिकावर फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. लष्करी अळीचा उपद्रव भात पीककाढणीच्या वेळी होत असून त्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.तुडतुड्यांचाही प्रादुर्भावमादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी, भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते. अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत आणि भात पिकाचे नुकसान होते.या व्यतिरिक्त निळ्या भुंग्याचा देखील प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती अलिबाग येथील शेतकरी वसंत म्हात्रे यांनी दिली. कृषी विभागाच्या माध्यमातून किडीच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.यंदाच्या खरीप हंगामातील ९३ टक्के पर्जन्यमान मंगळवारी पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. त्यापैकी ९३.७३ टक्के म्हणजे ४७ हजार १२९ मि.मी. पर्जन्यमान मंगळवारी सकाळी ८ वाजता पूर्ण झाले.पाली येथे सर्वात कमी ४८ टक्के पर्जन्यमानदरम्यान, म्हसळा येथे १०६ टक्के, पेण येथे १०५ टक्के, उरण येथे १०१ टक्के, माणगाव व तळा येथे १०२ टक्के, गिरिस्थान माथेरान येथे १५७ टक्के, कर्जत ९८ टक्के, महाड येथे ९७ टक्के, अलिबाग येथे ९६ टक्के, पनवेल येथे ९४ टक्के, रोहा येथे ८७ टक्के, पोलादपूर येथे ८३ टक्के, मुरुड व खालापूर येथे ८२ टक्के, श्रीवर्धन येथे ६८ टक्के, सुधागड-पाली येथे ४८ टक्के पर्जन्यमान झाले आहे.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात माहितीचा अभावजिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे, त्यातच करपा आणि खोडकिड्यांचा प्रादुर्भाव बहुतेक सर्व तालुक्यांत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या कार्यालयातून भात पीक वस्तुस्थिती संदर्भात माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड