शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

परतीच्या पावसाचा रायगडला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:04 IST

५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील भात पीकाची नासाडी : तलाठी व कृषी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाअभावी नुकसानी पंचनामा करण्यात दिरंगाई

- जयंत धुळप 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेले चक्रिवादळ आणि गुरुवारी झालेल्या परतीच्या पावसासह सोसाट्याच्या वाºयांमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी म्हसळा येथे सर्वाधिक ३० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर अन्यत्र माणगाव -१२, पनवेल-२९, पोलादपूर-२२, रोहा-२१, श्रीवर्धन-१० तर तळा येथे ११ मि.मी. झालेल्या पावसान भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाकडे प्रत्यक्ष पंचनामाअंती उपलब्ध माहितीनुसार, महाड तालुक्यातील १८१ शेतकºयांच्या ५१.८४ हेक्टर, माणगाव तालुक्यात ११२ शेतकºयांच्या ४५ हेक्टर, अलिबाग तालुक्यात २०० शेतकºयांच्या १८१ हेक्टर, तर पेण तालुक्यात सर्वाधिक ८०० शेतकºयांच्या एक हजार ४८० हेक्टर भातशेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील चक्रिवादळात नेमक्या किती शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले, याची माहिती कृषी विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. तर शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाच्या नुकसानीची देखील नेमकी माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. महसूल विभागाचा प्रतिनिधी असणारा ‘तलाठी’ आणि कृषी विभागाचा कर्मचारी यांच्या संयुक्त समन्वयातून नुकसानी पंचनामा होत असतो. मात्र, तलाठी आणि कृषी कर्मचारी यांच्या समन्वयाअभावी पंचनामा होऊ शकला नसल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांमध्ये मोठी नाराजी दिसून आली.

भात पीक नुकसानाचा पंचनामा होत नाही, तोपर्यंत शेतातील पडलेले भात पीक शेतकºयांना कापून आणता येत नाही. पंचनाम्यांना उशीर होत असल्याने शेतात पडलेले भात पीक पाण्यात कुजून पीक नुकसानात वाढ होते. मात्र, त्याची नोंद पंचनाम्याच्या वेळी होत नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांना मोठा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती महाडमधील शेतकरी सदाशिव शिर्के यांनी दिली.गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रिवादळात शेतातील उभे आणि दाणा भरण्याच्या अवस्थेतील भात पीक शेतात झोपले. त्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि विजयादशमीच्या दिवशी आलेल्या पावसात ते भात पीक पूर्णपणे भिजून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. यांची सरकार डबल नुकसानभरपाई देणार का, असा सवाल अलिबागमधील शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस