शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा रायगडला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:04 IST

५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील भात पीकाची नासाडी : तलाठी व कृषी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाअभावी नुकसानी पंचनामा करण्यात दिरंगाई

- जयंत धुळप 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेले चक्रिवादळ आणि गुरुवारी झालेल्या परतीच्या पावसासह सोसाट्याच्या वाºयांमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी म्हसळा येथे सर्वाधिक ३० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर अन्यत्र माणगाव -१२, पनवेल-२९, पोलादपूर-२२, रोहा-२१, श्रीवर्धन-१० तर तळा येथे ११ मि.मी. झालेल्या पावसान भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाकडे प्रत्यक्ष पंचनामाअंती उपलब्ध माहितीनुसार, महाड तालुक्यातील १८१ शेतकºयांच्या ५१.८४ हेक्टर, माणगाव तालुक्यात ११२ शेतकºयांच्या ४५ हेक्टर, अलिबाग तालुक्यात २०० शेतकºयांच्या १८१ हेक्टर, तर पेण तालुक्यात सर्वाधिक ८०० शेतकºयांच्या एक हजार ४८० हेक्टर भातशेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील चक्रिवादळात नेमक्या किती शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले, याची माहिती कृषी विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. तर शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाच्या नुकसानीची देखील नेमकी माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. महसूल विभागाचा प्रतिनिधी असणारा ‘तलाठी’ आणि कृषी विभागाचा कर्मचारी यांच्या संयुक्त समन्वयातून नुकसानी पंचनामा होत असतो. मात्र, तलाठी आणि कृषी कर्मचारी यांच्या समन्वयाअभावी पंचनामा होऊ शकला नसल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांमध्ये मोठी नाराजी दिसून आली.

भात पीक नुकसानाचा पंचनामा होत नाही, तोपर्यंत शेतातील पडलेले भात पीक शेतकºयांना कापून आणता येत नाही. पंचनाम्यांना उशीर होत असल्याने शेतात पडलेले भात पीक पाण्यात कुजून पीक नुकसानात वाढ होते. मात्र, त्याची नोंद पंचनाम्याच्या वेळी होत नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांना मोठा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती महाडमधील शेतकरी सदाशिव शिर्के यांनी दिली.गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रिवादळात शेतातील उभे आणि दाणा भरण्याच्या अवस्थेतील भात पीक शेतात झोपले. त्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि विजयादशमीच्या दिवशी आलेल्या पावसात ते भात पीक पूर्णपणे भिजून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. यांची सरकार डबल नुकसानभरपाई देणार का, असा सवाल अलिबागमधील शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस