शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

जबाबदार अधिकारीच अपत्तीच्या प्रसंगी जिल्ह्याबाहेर असल्याचे उघड

By admin | Updated: June 29, 2017 02:56 IST

संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जाऊ नये, तसेच अशा परिस्थितीत जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून बाहेर गेले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर आपत्ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीत दिलेले होते. असे असतानाही, हे आदेश झुगारून जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जात असल्याचे सोमवारी अलिबाग-रोहा राज्यमार्गावरील सहाण गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता खचल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी निष्पन्न झाले.सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अलिबाग रोहा राज्यमार्गावरील सहाण या गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता अतिवृष्टीमुळे खचला असून, येथे वाहतुकीस धोका असल्याचे येथे त्याच वेळी अलिबागला येताना पोहोचलेले शेतकरी महेश्वर देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून ही माहिती दिली. ‘लोकमत’ कार्यालयातून अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना कळवल्यावर ते आपल्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सरकारी व्यवस्थेतील पोहोचलेले ते पहिले अधिकारी होते. अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ हे दुसरे तर अलिबाग एसटी आगारप्रमुख तेजस गायकवाड हे तिसरे तत्काळ पोहोचणारे सरकारी अधिकारी होते. रायगड जिल्हा आपत्ती निवारण समितीचे सदस्य असणारे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे घटनास्थळी अनेकदा संपर्क करूनही पोहोचले नाहीत. त्यांच्या विभागाचे अन्य अभियंतादेखील कुणी घटनास्थळी फिरकले नाहीत. या संदर्भात पाटील यांना त्यांच्या कार्यालयात बुधवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले तर पाटील यांच्या मोबाइलवर अनेकदा फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपलब्ध माहितीनुसार अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे २४ ते २६ जून अशी शासकीय सुट्टी असल्यामुळे नाशिक येथे गेले होते, त्यामुळे २६ जून रोजी निर्माण झालेल्या सहाण येथील आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ते पोहोचू शकले नाहीत.सहाण येथील पुलाचा रस्ता खचल्यावर धोकादायक परिस्थितीच्या वेळी सहाण गावातील तरुणांनी रस्त्यावर येऊन तत्काळ वाहतूक नियंत्रण केले, तर अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे व तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी रस्त्यावरील धोकादायक भागावर बॅरिकेट्स लावून आवश्यक ती उपाययोजना केली. दरम्यान, या पुलावरून अलिबाग, मुरुड आणि रोहा एसटी आगाराच्या दररोज सुमारे २५ ते ३० बसेसच्या फेऱ्या होत असतात. धोकादायक झालेल्या पुलाची नेमकी काय परिस्थिती आहे, एसटी बसवाहतूक बंद करावी का सुरू ठेवावी, याबाबत खातरजमा करण्याकरिता मी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्याची माहिती अलिबाग एसटी आगाराचे आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी दिली.