शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

जबाबदार अधिकारीच अपत्तीच्या प्रसंगी जिल्ह्याबाहेर असल्याचे उघड

By admin | Updated: June 29, 2017 02:56 IST

संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जाऊ नये, तसेच अशा परिस्थितीत जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून बाहेर गेले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर आपत्ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीत दिलेले होते. असे असतानाही, हे आदेश झुगारून जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जात असल्याचे सोमवारी अलिबाग-रोहा राज्यमार्गावरील सहाण गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता खचल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी निष्पन्न झाले.सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अलिबाग रोहा राज्यमार्गावरील सहाण या गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता अतिवृष्टीमुळे खचला असून, येथे वाहतुकीस धोका असल्याचे येथे त्याच वेळी अलिबागला येताना पोहोचलेले शेतकरी महेश्वर देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून ही माहिती दिली. ‘लोकमत’ कार्यालयातून अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना कळवल्यावर ते आपल्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सरकारी व्यवस्थेतील पोहोचलेले ते पहिले अधिकारी होते. अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ हे दुसरे तर अलिबाग एसटी आगारप्रमुख तेजस गायकवाड हे तिसरे तत्काळ पोहोचणारे सरकारी अधिकारी होते. रायगड जिल्हा आपत्ती निवारण समितीचे सदस्य असणारे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे घटनास्थळी अनेकदा संपर्क करूनही पोहोचले नाहीत. त्यांच्या विभागाचे अन्य अभियंतादेखील कुणी घटनास्थळी फिरकले नाहीत. या संदर्भात पाटील यांना त्यांच्या कार्यालयात बुधवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले तर पाटील यांच्या मोबाइलवर अनेकदा फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपलब्ध माहितीनुसार अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे २४ ते २६ जून अशी शासकीय सुट्टी असल्यामुळे नाशिक येथे गेले होते, त्यामुळे २६ जून रोजी निर्माण झालेल्या सहाण येथील आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ते पोहोचू शकले नाहीत.सहाण येथील पुलाचा रस्ता खचल्यावर धोकादायक परिस्थितीच्या वेळी सहाण गावातील तरुणांनी रस्त्यावर येऊन तत्काळ वाहतूक नियंत्रण केले, तर अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे व तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी रस्त्यावरील धोकादायक भागावर बॅरिकेट्स लावून आवश्यक ती उपाययोजना केली. दरम्यान, या पुलावरून अलिबाग, मुरुड आणि रोहा एसटी आगाराच्या दररोज सुमारे २५ ते ३० बसेसच्या फेऱ्या होत असतात. धोकादायक झालेल्या पुलाची नेमकी काय परिस्थिती आहे, एसटी बसवाहतूक बंद करावी का सुरू ठेवावी, याबाबत खातरजमा करण्याकरिता मी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्याची माहिती अलिबाग एसटी आगाराचे आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी दिली.