शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदार अधिकारीच अपत्तीच्या प्रसंगी जिल्ह्याबाहेर असल्याचे उघड

By admin | Updated: June 29, 2017 02:56 IST

संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : संपूर्ण पावसाळ््यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जाऊ नये, तसेच अशा परिस्थितीत जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून बाहेर गेले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर आपत्ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीत दिलेले होते. असे असतानाही, हे आदेश झुगारून जबाबदार अधिकारी मुख्यालय सोडून जिल्ह्याबाहेर जात असल्याचे सोमवारी अलिबाग-रोहा राज्यमार्गावरील सहाण गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता खचल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी निष्पन्न झाले.सोमवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अलिबाग रोहा राज्यमार्गावरील सहाण या गावाजवळील पुलाला जोडणारा रस्ता अतिवृष्टीमुळे खचला असून, येथे वाहतुकीस धोका असल्याचे येथे त्याच वेळी अलिबागला येताना पोहोचलेले शेतकरी महेश्वर देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून ही माहिती दिली. ‘लोकमत’ कार्यालयातून अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना कळवल्यावर ते आपल्या फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सरकारी व्यवस्थेतील पोहोचलेले ते पहिले अधिकारी होते. अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ हे दुसरे तर अलिबाग एसटी आगारप्रमुख तेजस गायकवाड हे तिसरे तत्काळ पोहोचणारे सरकारी अधिकारी होते. रायगड जिल्हा आपत्ती निवारण समितीचे सदस्य असणारे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे घटनास्थळी अनेकदा संपर्क करूनही पोहोचले नाहीत. त्यांच्या विभागाचे अन्य अभियंतादेखील कुणी घटनास्थळी फिरकले नाहीत. या संदर्भात पाटील यांना त्यांच्या कार्यालयात बुधवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले तर पाटील यांच्या मोबाइलवर अनेकदा फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपलब्ध माहितीनुसार अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील हे २४ ते २६ जून अशी शासकीय सुट्टी असल्यामुळे नाशिक येथे गेले होते, त्यामुळे २६ जून रोजी निर्माण झालेल्या सहाण येथील आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ते पोहोचू शकले नाहीत.सहाण येथील पुलाचा रस्ता खचल्यावर धोकादायक परिस्थितीच्या वेळी सहाण गावातील तरुणांनी रस्त्यावर येऊन तत्काळ वाहतूक नियंत्रण केले, तर अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे व तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी रस्त्यावरील धोकादायक भागावर बॅरिकेट्स लावून आवश्यक ती उपाययोजना केली. दरम्यान, या पुलावरून अलिबाग, मुरुड आणि रोहा एसटी आगाराच्या दररोज सुमारे २५ ते ३० बसेसच्या फेऱ्या होत असतात. धोकादायक झालेल्या पुलाची नेमकी काय परिस्थिती आहे, एसटी बसवाहतूक बंद करावी का सुरू ठेवावी, याबाबत खातरजमा करण्याकरिता मी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्याची माहिती अलिबाग एसटी आगाराचे आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी दिली.