शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:38 IST

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी जयगड पोर्टकडे जाणारे जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले होते. नांगर टाकून हे जहाज थांबविण्यात आले होते. २४ तासांहून अधिक काळ खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या १४ खलाशांची अखेर शुक्रवारी सुटका करण्यात आली. या खलाशांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून सुखरूप किनाऱ्यावर आणले.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता. दरम्यान, यावेळी अलिबागमधील धरमतर येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेले जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज खवळलेल्या समुद्रात भरकटले. कुलाबा किल्ल्याजवळ  जहाजचालकाने प्रसंगावधान दाखवून, नांगर टाकून जहाज थांबविले. जहाज भर समुद्रात अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच १४ जणांच्या सुटकेसाठी कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. मात्र, काळोख आणि धो-धो पावसामुळे मदतकार्यात बाधा आली. त्यामुळे १४ खलाशांनी संपूर्ण रात्र ही जहाजात काढली. 

कोस्ट गार्डने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सर्च ऑपरेशन सुरू करून जहाज गाठले. हेलिकॉप्टरमधून प्रथम कोस्ट गार्डचे पथक जहाजावर उतरले. त्यांनी सात फेऱ्यांद्वारे कॅप्टन कालियामूर्ती पेरुमल (मास्टर), ठाकूर विजय सिंह (चीफ ऑफिसर), गौरव चौधरी (सेकंड ऑफिसर), अँटोनी कोल्लमपरंबिल अंतप्पान (चीफ इंजिनिअर), अलरी राज ज्ञान अर्पुथा राज (सेकंड इंजिनिअर), तनुषकुमार चिथिराय पंडी (थर्ड इंजिनिअर), अंबाडी माधव, विलिस्टन डेनिस, प्रभात कुमार, विराज विश्वनाथ मेहेर, पीयूष लेंका, अभिषेक सिंह, अभय यादव, निलाद्री अधिकारी यांना सुखरूप समुद्रकिनारी आणले. या सर्च ऑपरेशनवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

जहाज समुद्रात भरकटल्यानंतर १४ खलाशांच्या सुटकेसाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. सोसाट्याचा वारा, पावसाचा मारा सहन करत खलाशांचे बचावकार्य केले.

टॅग्स :Raigadरायगड