शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:38 IST

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी जयगड पोर्टकडे जाणारे जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले होते. नांगर टाकून हे जहाज थांबविण्यात आले होते. २४ तासांहून अधिक काळ खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या १४ खलाशांची अखेर शुक्रवारी सुटका करण्यात आली. या खलाशांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून सुखरूप किनाऱ्यावर आणले.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता. दरम्यान, यावेळी अलिबागमधील धरमतर येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेले जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज खवळलेल्या समुद्रात भरकटले. कुलाबा किल्ल्याजवळ  जहाजचालकाने प्रसंगावधान दाखवून, नांगर टाकून जहाज थांबविले. जहाज भर समुद्रात अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच १४ जणांच्या सुटकेसाठी कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. मात्र, काळोख आणि धो-धो पावसामुळे मदतकार्यात बाधा आली. त्यामुळे १४ खलाशांनी संपूर्ण रात्र ही जहाजात काढली. 

कोस्ट गार्डने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सर्च ऑपरेशन सुरू करून जहाज गाठले. हेलिकॉप्टरमधून प्रथम कोस्ट गार्डचे पथक जहाजावर उतरले. त्यांनी सात फेऱ्यांद्वारे कॅप्टन कालियामूर्ती पेरुमल (मास्टर), ठाकूर विजय सिंह (चीफ ऑफिसर), गौरव चौधरी (सेकंड ऑफिसर), अँटोनी कोल्लमपरंबिल अंतप्पान (चीफ इंजिनिअर), अलरी राज ज्ञान अर्पुथा राज (सेकंड इंजिनिअर), तनुषकुमार चिथिराय पंडी (थर्ड इंजिनिअर), अंबाडी माधव, विलिस्टन डेनिस, प्रभात कुमार, विराज विश्वनाथ मेहेर, पीयूष लेंका, अभिषेक सिंह, अभय यादव, निलाद्री अधिकारी यांना सुखरूप समुद्रकिनारी आणले. या सर्च ऑपरेशनवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

जहाज समुद्रात भरकटल्यानंतर १४ खलाशांच्या सुटकेसाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. सोसाट्याचा वारा, पावसाचा मारा सहन करत खलाशांचे बचावकार्य केले.

टॅग्स :Raigadरायगड