शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अवयवदान केल्याने मिळणार माणसाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:00 AM

पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे.

मुरुड जंजिरा : पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे. देशात २२ लाख डोळ्यांची गरज आहे. मात्र, मिळतात फक्त साडेअकरा लाख. साडेअकरा हजार किडन्या आवश्यक आहेत. ७२ हृदयांची गरज आहे. वर्षाला ९0 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी ४९ हजार लोकच नेत्रदान करतात. अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण सहसंचालक पद्मश्री तात्याराव लहाने यांनी मुरु ड येथे केले.संजीवनी आरोग्य सेवा समिती मुरुड यांच्या वतीने व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने यांचा नागरी सत्कार शहरात बाजारपेठेतील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार पंडित पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संजीवनी आरोग्य संघटनेचे अध्यक्ष विजय सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सभापती नीता घाटवळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, डॉ. रागिणी पारेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ,नगरपरिषद विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर,चंद्रकांत अपराध, नगरसेवक मनोज भगत, तहसीलदार उमेश पाटील, डॉ. प्रवीण बागुल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.लहाने म्हणाले, अवयवदानाचे सर्वात जास्त महत्त्व श्रीलंकेला कळले आहे. श्रीलंकेत एक लाख लोक मृत्युमुखी पडत असतील तर दोन लाख डोळे मिळतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीस जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्याचे अवयव दुसºया व्यक्तीच्या कामास येत असतील तर त्याला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. लोकांनी गरज ओळखून काळानुरूप पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डोळे चांगले राहण्यासाठी डोळ्यांना अ जीवनसत्त्व मिळण्यासाठी गाजर, पपई व शेवग्याच्या शेंगा आहारात वापराव्यात, असे आवाहनसुद्धा या वेळी त्यांनी केले.आमदार पंडित पाटील म्हणाले की, डॉ. लहाने यांनी खºया अर्थाने समाजाची सेवा केली आहे. आज आरोग्य विभागातील ५0 टक्के पदे भरली जात नाही. या सरकारने पूल बांधण्यापेक्षा लोकांच्या आरोग्यावर जास्त रक्कम खर्च करावी, असे ते या वेळी म्हणाले. शालेय पोषण आहार योजनेतून खराब तेलाचा वापर झाल्याने रायगड जिल्ह्यातील १०८ विद्यार्थ्यांना हृदयविकार झाला आहे. त्यामुळे सदरची योजना बंदच करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. लोकांनी भजन, कीर्तनाबरोबरच आरोग्यावर जास्त लक्ष देऊन नियमित व्यायाम करण्याचाही सल्ला या वेळी आमदार पाटील यांनी दिला.