शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान केल्याने मिळणार माणसाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:00 IST

पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे.

मुरुड जंजिरा : पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे. देशात २२ लाख डोळ्यांची गरज आहे. मात्र, मिळतात फक्त साडेअकरा लाख. साडेअकरा हजार किडन्या आवश्यक आहेत. ७२ हृदयांची गरज आहे. वर्षाला ९0 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी ४९ हजार लोकच नेत्रदान करतात. अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण सहसंचालक पद्मश्री तात्याराव लहाने यांनी मुरु ड येथे केले.संजीवनी आरोग्य सेवा समिती मुरुड यांच्या वतीने व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने यांचा नागरी सत्कार शहरात बाजारपेठेतील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार पंडित पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संजीवनी आरोग्य संघटनेचे अध्यक्ष विजय सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सभापती नीता घाटवळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, डॉ. रागिणी पारेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ,नगरपरिषद विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर,चंद्रकांत अपराध, नगरसेवक मनोज भगत, तहसीलदार उमेश पाटील, डॉ. प्रवीण बागुल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.लहाने म्हणाले, अवयवदानाचे सर्वात जास्त महत्त्व श्रीलंकेला कळले आहे. श्रीलंकेत एक लाख लोक मृत्युमुखी पडत असतील तर दोन लाख डोळे मिळतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीस जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्याचे अवयव दुसºया व्यक्तीच्या कामास येत असतील तर त्याला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. लोकांनी गरज ओळखून काळानुरूप पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डोळे चांगले राहण्यासाठी डोळ्यांना अ जीवनसत्त्व मिळण्यासाठी गाजर, पपई व शेवग्याच्या शेंगा आहारात वापराव्यात, असे आवाहनसुद्धा या वेळी त्यांनी केले.आमदार पंडित पाटील म्हणाले की, डॉ. लहाने यांनी खºया अर्थाने समाजाची सेवा केली आहे. आज आरोग्य विभागातील ५0 टक्के पदे भरली जात नाही. या सरकारने पूल बांधण्यापेक्षा लोकांच्या आरोग्यावर जास्त रक्कम खर्च करावी, असे ते या वेळी म्हणाले. शालेय पोषण आहार योजनेतून खराब तेलाचा वापर झाल्याने रायगड जिल्ह्यातील १०८ विद्यार्थ्यांना हृदयविकार झाला आहे. त्यामुळे सदरची योजना बंदच करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. लोकांनी भजन, कीर्तनाबरोबरच आरोग्यावर जास्त लक्ष देऊन नियमित व्यायाम करण्याचाही सल्ला या वेळी आमदार पाटील यांनी दिला.