शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अवयवदान केल्याने मिळणार माणसाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:00 IST

पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे.

मुरुड जंजिरा : पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे. देशात २२ लाख डोळ्यांची गरज आहे. मात्र, मिळतात फक्त साडेअकरा लाख. साडेअकरा हजार किडन्या आवश्यक आहेत. ७२ हृदयांची गरज आहे. वर्षाला ९0 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी ४९ हजार लोकच नेत्रदान करतात. अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण सहसंचालक पद्मश्री तात्याराव लहाने यांनी मुरु ड येथे केले.संजीवनी आरोग्य सेवा समिती मुरुड यांच्या वतीने व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने यांचा नागरी सत्कार शहरात बाजारपेठेतील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार पंडित पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संजीवनी आरोग्य संघटनेचे अध्यक्ष विजय सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सभापती नीता घाटवळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, डॉ. रागिणी पारेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ,नगरपरिषद विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर,चंद्रकांत अपराध, नगरसेवक मनोज भगत, तहसीलदार उमेश पाटील, डॉ. प्रवीण बागुल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.लहाने म्हणाले, अवयवदानाचे सर्वात जास्त महत्त्व श्रीलंकेला कळले आहे. श्रीलंकेत एक लाख लोक मृत्युमुखी पडत असतील तर दोन लाख डोळे मिळतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीस जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्याचे अवयव दुसºया व्यक्तीच्या कामास येत असतील तर त्याला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. लोकांनी गरज ओळखून काळानुरूप पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डोळे चांगले राहण्यासाठी डोळ्यांना अ जीवनसत्त्व मिळण्यासाठी गाजर, पपई व शेवग्याच्या शेंगा आहारात वापराव्यात, असे आवाहनसुद्धा या वेळी त्यांनी केले.आमदार पंडित पाटील म्हणाले की, डॉ. लहाने यांनी खºया अर्थाने समाजाची सेवा केली आहे. आज आरोग्य विभागातील ५0 टक्के पदे भरली जात नाही. या सरकारने पूल बांधण्यापेक्षा लोकांच्या आरोग्यावर जास्त रक्कम खर्च करावी, असे ते या वेळी म्हणाले. शालेय पोषण आहार योजनेतून खराब तेलाचा वापर झाल्याने रायगड जिल्ह्यातील १०८ विद्यार्थ्यांना हृदयविकार झाला आहे. त्यामुळे सदरची योजना बंदच करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. लोकांनी भजन, कीर्तनाबरोबरच आरोग्यावर जास्त लक्ष देऊन नियमित व्यायाम करण्याचाही सल्ला या वेळी आमदार पाटील यांनी दिला.