शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाताळगंगा पुलाची दुरवस्था; वाहतूक मंद गतीने होत असल्याने कोंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:21 IST

खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान । प्रवासी त्रस्त; चालक हैराण

राकेश खराडे मोहोपाडा : औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पाताळगंगा पुलाची बिकट अवस्था झाली असून या पुलाला जागोजागी खड्डे पडून काही ठिकाणी लोखंडी प्लेट्स व शिगा बाहेर आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सायंकाळनंतर दुचाकी चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आपटून अपघात होत आहेत. पुलाची याअगोदर अनेकदा थातुरमातुर डागडुजी करण्यात आली होती, परंतु पावसाळा सुरू झाला की परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.

हा पूल बांधून ३६ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले असून पुलावर उभे राहिल्यास वाहन जात असताना पूल दुभंगला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुलाचा भाग खचल्याने अवजड वाहन पाताळगंगा नदीत कोसळल्याची घटना घडली होती. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. पाताळगंगा क्षेत्राकडे दांड-रसायनीहून जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर हा एकमेव पूल आहे. या पुलावरुन दैनंदिन शेकडो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. या पुलाला पर्याय म्हणून दुसºया पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या रहदारीसाठी जुन्याच पुलाचा वापर होत असल्याने या पुलावरून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधितांनी जुन्या पुलाचे काम करुन भविष्यातील धोका टाळावा तसेच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.कायमस्वरूपी काम करण्याची मागणीऔद्योगिक क्षेत्राला जोडणारा पाताळगंगा हा एकमेव पूल असून या रस्त्यावरुन शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. पाताळगंगा पुलाची दुरवस्था होवून लोखंडी प्लेट्स ,स्टील रॉड बाहेर आल्याने वाहनांचे नुकसान होवून अपघात होत आहेत. खड्ड्यात वाहन आदळल्याने काहींना कंबरदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी येथून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.दुचाकीस्वार त्रस्तया पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर एखादे मोठे वाहन या पाण्यातून गेले तर दुचाकीवरून आलेल्या वाहन चालकाच्या अंगावर हे साचलेले पाणी उडत आहे. यामुळे दुचाकीस्वारांना येथून प्रवास करताना जपून जावे लागत आहे.