शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पाताळगंगा पुलाची दुरवस्था; वाहतूक मंद गतीने होत असल्याने कोंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:21 IST

खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान । प्रवासी त्रस्त; चालक हैराण

राकेश खराडे मोहोपाडा : औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पाताळगंगा पुलाची बिकट अवस्था झाली असून या पुलाला जागोजागी खड्डे पडून काही ठिकाणी लोखंडी प्लेट्स व शिगा बाहेर आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सायंकाळनंतर दुचाकी चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आपटून अपघात होत आहेत. पुलाची याअगोदर अनेकदा थातुरमातुर डागडुजी करण्यात आली होती, परंतु पावसाळा सुरू झाला की परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.

हा पूल बांधून ३६ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले असून पुलावर उभे राहिल्यास वाहन जात असताना पूल दुभंगला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुलाचा भाग खचल्याने अवजड वाहन पाताळगंगा नदीत कोसळल्याची घटना घडली होती. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. पाताळगंगा क्षेत्राकडे दांड-रसायनीहून जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर हा एकमेव पूल आहे. या पुलावरुन दैनंदिन शेकडो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. या पुलाला पर्याय म्हणून दुसºया पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या रहदारीसाठी जुन्याच पुलाचा वापर होत असल्याने या पुलावरून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधितांनी जुन्या पुलाचे काम करुन भविष्यातील धोका टाळावा तसेच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.कायमस्वरूपी काम करण्याची मागणीऔद्योगिक क्षेत्राला जोडणारा पाताळगंगा हा एकमेव पूल असून या रस्त्यावरुन शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. पाताळगंगा पुलाची दुरवस्था होवून लोखंडी प्लेट्स ,स्टील रॉड बाहेर आल्याने वाहनांचे नुकसान होवून अपघात होत आहेत. खड्ड्यात वाहन आदळल्याने काहींना कंबरदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी येथून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.दुचाकीस्वार त्रस्तया पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर एखादे मोठे वाहन या पाण्यातून गेले तर दुचाकीवरून आलेल्या वाहन चालकाच्या अंगावर हे साचलेले पाणी उडत आहे. यामुळे दुचाकीस्वारांना येथून प्रवास करताना जपून जावे लागत आहे.