शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेल्या ३६ वर्षांपासून प्रलंबित आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. जी. कोणसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीन दिवसीय ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. माजी न्यायमूर्ती कोणसे पाटील यांनी भाजप सरकारवर टीका करतानाच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला. अंबानी विरोधात लढण्यास स्थानिक नेत्यांना वावडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नागोठणे येथील आताची रिलायन्स व पूर्वीच्या आयपीसीएल कंपनीसाठी १९८३ सालापासून ते १९८९ सालापर्यंत शेतकऱ्यांचा जमिनी पेट्रो केमिकल्स कॉम्प्लेक्ससाठी संपादित केल्या होत्या. आयपीसीएल कंपनीत एका व्यक्तीला कायमस्वरूपाची नोकरी देण्याचे लेखी कबूल केले होते. मात्र, गेली ३६ वर्षे हे प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांपासून वंचित आहेत. कंपनी आणि सरकारकडे आपल्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने प्रकल्पग्रस्त पाठपुरावा करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जानेवारी २०१९ रोजी समितीबरोबर बोलाविलेली बैठक आयत्या वेळी रद्द केली. त्यानंतर आजपर्यंत या प्रकल्पग्रस्तांची कोणतीही दखल घेतलेली नाही. बुधवारी अलिबाग शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ३१ जुलै ते २ आगस्ट रोजी असे तीन दिवस हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.प्रमुख मागण्याच्प्रकल्पग्रस्तांपैकी उरलेले ६३७ प्रकल्पग्रस्त त्यांच्या वारसदारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे,च्नोकरभरतीमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे. कंत्राटी कामगारांना किमान २५ हजार रुपये देण्यात यावेत, रिलायन्स व्यवस्थापनाकडून कामगारांवर दडपशाही, मानसिक छळ करणाºया अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, निवृत्ती मर्यादा ६० वर्षे करावी.

टॅग्स :Relianceरिलायन्सalibaugअलिबाग