शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेल्या ३६ वर्षांपासून प्रलंबित आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. जी. कोणसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीन दिवसीय ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. माजी न्यायमूर्ती कोणसे पाटील यांनी भाजप सरकारवर टीका करतानाच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला. अंबानी विरोधात लढण्यास स्थानिक नेत्यांना वावडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नागोठणे येथील आताची रिलायन्स व पूर्वीच्या आयपीसीएल कंपनीसाठी १९८३ सालापासून ते १९८९ सालापर्यंत शेतकऱ्यांचा जमिनी पेट्रो केमिकल्स कॉम्प्लेक्ससाठी संपादित केल्या होत्या. आयपीसीएल कंपनीत एका व्यक्तीला कायमस्वरूपाची नोकरी देण्याचे लेखी कबूल केले होते. मात्र, गेली ३६ वर्षे हे प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांपासून वंचित आहेत. कंपनी आणि सरकारकडे आपल्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने प्रकल्पग्रस्त पाठपुरावा करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जानेवारी २०१९ रोजी समितीबरोबर बोलाविलेली बैठक आयत्या वेळी रद्द केली. त्यानंतर आजपर्यंत या प्रकल्पग्रस्तांची कोणतीही दखल घेतलेली नाही. बुधवारी अलिबाग शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ३१ जुलै ते २ आगस्ट रोजी असे तीन दिवस हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.प्रमुख मागण्याच्प्रकल्पग्रस्तांपैकी उरलेले ६३७ प्रकल्पग्रस्त त्यांच्या वारसदारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे,च्नोकरभरतीमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे. कंत्राटी कामगारांना किमान २५ हजार रुपये देण्यात यावेत, रिलायन्स व्यवस्थापनाकडून कामगारांवर दडपशाही, मानसिक छळ करणाºया अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, निवृत्ती मर्यादा ६० वर्षे करावी.

टॅग्स :Relianceरिलायन्सalibaugअलिबाग