शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेल्या ३६ वर्षांपासून प्रलंबित आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. जी. कोणसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीन दिवसीय ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. माजी न्यायमूर्ती कोणसे पाटील यांनी भाजप सरकारवर टीका करतानाच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचाही खरपूस समाचार घेतला. अंबानी विरोधात लढण्यास स्थानिक नेत्यांना वावडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नागोठणे येथील आताची रिलायन्स व पूर्वीच्या आयपीसीएल कंपनीसाठी १९८३ सालापासून ते १९८९ सालापर्यंत शेतकऱ्यांचा जमिनी पेट्रो केमिकल्स कॉम्प्लेक्ससाठी संपादित केल्या होत्या. आयपीसीएल कंपनीत एका व्यक्तीला कायमस्वरूपाची नोकरी देण्याचे लेखी कबूल केले होते. मात्र, गेली ३६ वर्षे हे प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांपासून वंचित आहेत. कंपनी आणि सरकारकडे आपल्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने प्रकल्पग्रस्त पाठपुरावा करीत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जानेवारी २०१९ रोजी समितीबरोबर बोलाविलेली बैठक आयत्या वेळी रद्द केली. त्यानंतर आजपर्यंत या प्रकल्पग्रस्तांची कोणतीही दखल घेतलेली नाही. बुधवारी अलिबाग शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ३१ जुलै ते २ आगस्ट रोजी असे तीन दिवस हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.प्रमुख मागण्याच्प्रकल्पग्रस्तांपैकी उरलेले ६३७ प्रकल्पग्रस्त त्यांच्या वारसदारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे,च्नोकरभरतीमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे. कंत्राटी कामगारांना किमान २५ हजार रुपये देण्यात यावेत, रिलायन्स व्यवस्थापनाकडून कामगारांवर दडपशाही, मानसिक छळ करणाºया अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, निवृत्ती मर्यादा ६० वर्षे करावी.

टॅग्स :Relianceरिलायन्सalibaugअलिबाग