शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

उरणमध्ये आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 18:23 IST

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : १७ हेक्टर क्षेत्रावर फेर पुनर्वसन करण्याचे वारंवार आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या तोंडाला जेएनपीएने पुसली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी रविवारीच (८) जुन्या मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी कुटूंबियांसह जेएनपीए प्रशासनाविरोधात आंदोलनाला सुरुवात  केली आहे.   जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत. बंदर उभारण्यापुर्वीच शेवा- कोळीवाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन बोरी-पाखाडी येथे करण्यात आले आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून १७ हेक्टर ऐवजी फक्त दोन हेक्टर जमीनीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवी लागली आहे.वाळवीने पोखरलेली ग्रामस्थांची घरे एकापाठोपाठ एक अशी कोसळली आहेत.हनुमान कोळीवाडा वाळवीने पोखरले गाव अशीच ओळख देशभरात झाली आहे. तेव्हापासुनच शासनाच्या नियमानुसार १७ हेक्टर विकसित जागेतच वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावातील रहिवाशांचे फेर पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी केंद्र,राज्य, जेएनपीए, सिडको, महसूल, पोलिस प्रशासनाशी ग्रामस्थांचा मागील ३५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. 

 

संघर्षानंतर जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.मात्र तांत्रिक कारणे पुढे करून जेएनपीए, सिडको, महसूल विभागाकडून वारंवार फेर पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी अखंडपणे चालढकल करुन ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.त्यामुळे आता भू-संपादन केलेल्या जमिनीचा वापर  केला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी ( ८) मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज रस्त्याची साफसफाई तर उद्यापासून मूळ जागेचा ताबा घेण्यासाठी ग्रामस्थ हल्लाबोल करतील.

जागेचा ताबा मिळेपर्यंत जेएनपीए,शासनाविरोधात सुरू करण्यात आलेला संघर्ष सुरूच राहणार आहे. आता माघार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जेएनपीए प्रशासन भवन,रस्ते व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून १२५ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरण