शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उरणमध्ये आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 18:23 IST

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : १७ हेक्टर क्षेत्रावर फेर पुनर्वसन करण्याचे वारंवार आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या तोंडाला जेएनपीएने पुसली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी रविवारीच (८) जुन्या मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी कुटूंबियांसह जेएनपीए प्रशासनाविरोधात आंदोलनाला सुरुवात  केली आहे.   जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत. बंदर उभारण्यापुर्वीच शेवा- कोळीवाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन बोरी-पाखाडी येथे करण्यात आले आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून १७ हेक्टर ऐवजी फक्त दोन हेक्टर जमीनीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवी लागली आहे.वाळवीने पोखरलेली ग्रामस्थांची घरे एकापाठोपाठ एक अशी कोसळली आहेत.हनुमान कोळीवाडा वाळवीने पोखरले गाव अशीच ओळख देशभरात झाली आहे. तेव्हापासुनच शासनाच्या नियमानुसार १७ हेक्टर विकसित जागेतच वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावातील रहिवाशांचे फेर पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी केंद्र,राज्य, जेएनपीए, सिडको, महसूल, पोलिस प्रशासनाशी ग्रामस्थांचा मागील ३५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. 

 

संघर्षानंतर जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.जेएनपीए, सिडको, महसूल विभागाने लागलीच १७ हेक्टर जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.मात्र तांत्रिक कारणे पुढे करून जेएनपीए, सिडको, महसूल विभागाकडून वारंवार फेर पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी अखंडपणे चालढकल करुन ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.त्यामुळे आता भू-संपादन केलेल्या जमिनीचा वापर  केला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी ( ८) मुळ गावठाणातील जागेचा ताबा घेण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज रस्त्याची साफसफाई तर उद्यापासून मूळ जागेचा ताबा घेण्यासाठी ग्रामस्थ हल्लाबोल करतील.

जागेचा ताबा मिळेपर्यंत जेएनपीए,शासनाविरोधात सुरू करण्यात आलेला संघर्ष सुरूच राहणार आहे. आता माघार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जेएनपीए प्रशासन भवन,रस्ते व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून १२५ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरण