शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लाल केळीच्या उत्पन्नात वाढ!

By admin | Updated: August 27, 2015 23:15 IST

रायगड जिल्हा परिषदेने लाल केळीच्या पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतीला पुन्हा सुगीचे दिवस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या ५० हेक्टर क्षेत्रामध्ये

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेने लाल केळीच्या पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतीला पुन्हा सुगीचे दिवस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या ५० हेक्टर क्षेत्रामध्ये तब्बल ५०० हेक्टरपर्यंत वाढ करून वर्षाला ३० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा पर्याय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. केरळ राज्यातील लाल केळी जिल्ह्यात पिकविण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.औद्योगिकीकरणाच्या रेट्यामध्ये शेतीचे क्षेत्र कमी होत आहे, तर दुसरीकडे शेतीची ओळख ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे साधन अशी झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने भाताचे पीक घेतले जाते. त्याचप्रमाणे आंबा, काजू, नाचणी, वाल आणि भाजीपाला यांचीही शेती केली जाते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या पट्ट्यामध्ये केळीच्या बागा बऱ्यापैकी विकसित झाल्या आहेत. या पट्ट्यामध्ये सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावरच साध्या लांब केळीचे पीक घेतले जाते. केरळ राज्यातील लाल केळीच्या जाती जिल्ह्यात काही शेतकऱ्यांकडे आहेत. त्यांच्याकडून घेतलेल्या कंदावर दापोली कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. लाल केळीची कार्यपद्धती विकसित करून केळीची रोपे त्यांच्याकडूनच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी दिली.केळी पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि जिल्ह्यामध्ये पाऊस मुबलक प्रमाणात पडत असल्याने पाण्याची कमतरता नाही. एक हेक्टरमध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न केळी पिकाच्या माध्यमातून प्राप्त होते. सध्या ५० हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जात असून ते विखुरलेले आहे.लाल केळींना बाजारात मागणीकेळीचे क्षेत्र ५०० हेक्टरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याने त्या माध्यमातून ( ५०० गुणिले सहा लाख ) = ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविणे सहज शक्य होणार आहे. लाल केळी बाजारात १५० रुपये डझनने विकली जातात. ती चवीला गोड आणि मधुर असतात.या लाल केळींना बाजारात मागणी आहे. जिल्ह्यात पिकविलेली लाल केळी मुंबईच्या बाजारात विकल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाल केळीचे पीक घेऊन उत्पन्न वाढवावे असे आवाहनही जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा केरळ राज्यात गेला होता. तेथे लाल केळी आणि तिच्या अर्थकारणाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाल केळीचे पीक घेतल्यास तेही संपन्न होऊ शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाल केळीचे पीक घ्यावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून प्रोत्साहित करण्यात येणार आहे.- अरविंद म्हात्रे, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद