शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

रेशनिंग दुकानदारांचे परवाने होणार रद्द?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:06 IST

कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी काही रेशनिंग धारकांना धान्य न दिल्याने याबाबत कर्जतच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे.रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य नॉमिनीद्वारे काढले आहे, त्यामुळे ते लाभार्थ्यांला मिळू शकले नाही. दुकानदाराने धान्याचा अपहार केला असून या प्रकरणी त्याच्या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा, असा अहवाल कर्जत तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.अन्न सुरक्षा योजनेतून गरीब कुटुंबाला, तर निराधार, अपंग, आदिवासी बांधवांना अंत्योदयचा लाभ दिला जातो; परंतु रेशनिंग दुकानदार लाभार्थींना धान्य देत नसल्याचे उघड झाले आहे. नेरळ दहिवली येथील रास्तभाव दुकानदाराने कल्पना रामचंद्र राणे यांचे जून ते सप्टेंबर २०१८ पर्यंतचे धान्य नॉमिमीद्वारे वितरित केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना तीन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही, तसेच कोल्हारे येथील दुकानदाराने राजू हरिचंद्र बार्शी याचेही रेशन कार्डवरील १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ मध्ये नॉमिनीद्वारे वितरित केले आहे, तसेच डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्डधारकांनी स्वत: घेतल्याचे दिसून येते; परंतु सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत रजिस्टरमध्ये धान्य वितरणाची नोंद नाही.नेरळमधील रास्त भाव दुकान ५ मध्ये पांडुरंग बैकर यांना १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू हे मे २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत दिल्याची नोंद आरसी बुकमध्ये दिसत असली तरी विक्री रजिस्टर तपासले असता, नोंद आढळली नाही. तसेच कार्डधारकांच्या कार्डावरही याची नोंद नाही. नेरळ परिसरातील नेरळ, दहिवली आणि कोल्हारे रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द कण्यात यावा, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.>धान्यांचा अपहार करून गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रकार नेरळ परिसरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यानुसार कर्जत तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. संबंधित रेशनिंग दुकानांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.- विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे