शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

रेशनिंग दुकानदारांचे परवाने होणार रद्द?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:06 IST

कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी काही रेशनिंग धारकांना धान्य न दिल्याने याबाबत कर्जतच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे.रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य नॉमिनीद्वारे काढले आहे, त्यामुळे ते लाभार्थ्यांला मिळू शकले नाही. दुकानदाराने धान्याचा अपहार केला असून या प्रकरणी त्याच्या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा, असा अहवाल कर्जत तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.अन्न सुरक्षा योजनेतून गरीब कुटुंबाला, तर निराधार, अपंग, आदिवासी बांधवांना अंत्योदयचा लाभ दिला जातो; परंतु रेशनिंग दुकानदार लाभार्थींना धान्य देत नसल्याचे उघड झाले आहे. नेरळ दहिवली येथील रास्तभाव दुकानदाराने कल्पना रामचंद्र राणे यांचे जून ते सप्टेंबर २०१८ पर्यंतचे धान्य नॉमिमीद्वारे वितरित केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना तीन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही, तसेच कोल्हारे येथील दुकानदाराने राजू हरिचंद्र बार्शी याचेही रेशन कार्डवरील १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ मध्ये नॉमिनीद्वारे वितरित केले आहे, तसेच डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्डधारकांनी स्वत: घेतल्याचे दिसून येते; परंतु सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत रजिस्टरमध्ये धान्य वितरणाची नोंद नाही.नेरळमधील रास्त भाव दुकान ५ मध्ये पांडुरंग बैकर यांना १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू हे मे २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत दिल्याची नोंद आरसी बुकमध्ये दिसत असली तरी विक्री रजिस्टर तपासले असता, नोंद आढळली नाही. तसेच कार्डधारकांच्या कार्डावरही याची नोंद नाही. नेरळ परिसरातील नेरळ, दहिवली आणि कोल्हारे रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द कण्यात यावा, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.>धान्यांचा अपहार करून गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रकार नेरळ परिसरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यानुसार कर्जत तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. संबंधित रेशनिंग दुकानांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.- विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे