शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

रेशनिंग दुकानदारांचे परवाने होणार रद्द?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:06 IST

कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात धान्यांचा अपहार करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे, अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी काही रेशनिंग धारकांना धान्य न दिल्याने याबाबत कर्जतच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे.रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य नॉमिनीद्वारे काढले आहे, त्यामुळे ते लाभार्थ्यांला मिळू शकले नाही. दुकानदाराने धान्याचा अपहार केला असून या प्रकरणी त्याच्या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा, असा अहवाल कर्जत तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.अन्न सुरक्षा योजनेतून गरीब कुटुंबाला, तर निराधार, अपंग, आदिवासी बांधवांना अंत्योदयचा लाभ दिला जातो; परंतु रेशनिंग दुकानदार लाभार्थींना धान्य देत नसल्याचे उघड झाले आहे. नेरळ दहिवली येथील रास्तभाव दुकानदाराने कल्पना रामचंद्र राणे यांचे जून ते सप्टेंबर २०१८ पर्यंतचे धान्य नॉमिमीद्वारे वितरित केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना तीन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही, तसेच कोल्हारे येथील दुकानदाराने राजू हरिचंद्र बार्शी याचेही रेशन कार्डवरील १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ मध्ये नॉमिनीद्वारे वितरित केले आहे, तसेच डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्डधारकांनी स्वत: घेतल्याचे दिसून येते; परंतु सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत रजिस्टरमध्ये धान्य वितरणाची नोंद नाही.नेरळमधील रास्त भाव दुकान ५ मध्ये पांडुरंग बैकर यांना १८ किलो तांदूळ व १२ किलो गहू हे मे २०१८ पासून जानेवारी २०१९ पर्यंत दिल्याची नोंद आरसी बुकमध्ये दिसत असली तरी विक्री रजिस्टर तपासले असता, नोंद आढळली नाही. तसेच कार्डधारकांच्या कार्डावरही याची नोंद नाही. नेरळ परिसरातील नेरळ, दहिवली आणि कोल्हारे रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या रास्त भाव दुकानावर तत्काळ कारवाई करून परवाना रद्द कण्यात यावा, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला आहे.>धान्यांचा अपहार करून गोरगरीब जनतेला लुटण्याचा प्रकार नेरळ परिसरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नेरळ परिसरातील नेरळ खांडा, दहिवली आणि कोल्हारे या रेशनिंग दुकानदारांनी अपहार केल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यानुसार कर्जत तहसीलदार कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. संबंधित रेशनिंग दुकानांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.- विजय हजारे, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हारे