शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रणगाडा अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर; तरुणांना मिळेल प्रोत्साहन - डाॅ. विजय सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:47 IST

Alibag beach : तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता.

अलिबाग : सध्या सीमेवर लढण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरुणांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर सैनिक व अधिकारी म्हणून रुजू व्हावे या दृष्टीने तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी युद्धात पराक्रम गाजविलेला रणगाडा अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर ठेवला असल्याचे कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. लाेकमतच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक हा  देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित केला होता.तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी, यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते ते शुक्रवारी पूर्णत्वास नेले आहे. अलिबाग येथे रणगाडा मिळावा यासाठी माजी संरक्षणमंत्री सुरेश भामरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी तत्काळ मागणी पूर्ण केल्याने शुक्रवारी टीकेटी ५५ रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढवीत असल्याचे डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.ते म्हणाले की, तरुणाईला संरक्षण दलात जायला प्रेरणा देण्यासाठी तसेच अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तेथे रणगाडा बसवण्याची संकल्पना मनात आली. त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आणि स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे, तर दुसरीकडे स्थानिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे आता अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

पर्यटनवाढीला चालना मिळणार - निधी चौधरीअलिबाग हे पर्यटनस्थळ आहे. अलिबागला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला असल्याने त्याच्या सौंदर्यांत भर पडली आहे. अलिबागचे हेच निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी अलिबागमध्ये येत असतात. तसेच समुद्राचा आनंद लुटतात. मात्र आता अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘वॉर ट्रॉफी’ म्हणून बोलले जाणारा रणगाडा बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता पर्यटनवाढीला चालना मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.

रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार - पाटीलअनेक युद्धे गाजवणारा हा रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कल्पना मांडली आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर आज त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने माॅडेल म्हणून ओळखले जाणार आहे, असे आमदार जयंत पाटील यांनी भाषणात सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग