शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रणगाडा अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर; तरुणांना मिळेल प्रोत्साहन - डाॅ. विजय सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:47 IST

Alibag beach : तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता.

अलिबाग : सध्या सीमेवर लढण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरुणांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर सैनिक व अधिकारी म्हणून रुजू व्हावे या दृष्टीने तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी युद्धात पराक्रम गाजविलेला रणगाडा अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर ठेवला असल्याचे कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. लाेकमतच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक हा  देशभक्तीपर कार्यक्रम आयाेजित केला होता.तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रति अभिमान आणि कृतज्ञतेची भावाना कायम रुजत राहावी, यासाठी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी रणगाडा ठेवण्यात येईल, असे अभिवचन तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमात दिले हाेते ते शुक्रवारी पूर्णत्वास नेले आहे. अलिबाग येथे रणगाडा मिळावा यासाठी माजी संरक्षणमंत्री सुरेश भामरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी तत्काळ मागणी पूर्ण केल्याने शुक्रवारी टीकेटी ५५ रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढवीत असल्याचे डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.ते म्हणाले की, तरुणाईला संरक्षण दलात जायला प्रेरणा देण्यासाठी तसेच अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याची शोभा वाढावी या दृष्टिकोनातून तेथे रणगाडा बसवण्याची संकल्पना मनात आली. त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आणि स्वप्नपूर्ती झाल्याने आज खूप आनंद होत आहे, तर दुसरीकडे स्थानिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. त्यामुळे आता अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

पर्यटनवाढीला चालना मिळणार - निधी चौधरीअलिबाग हे पर्यटनस्थळ आहे. अलिबागला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला असल्याने त्याच्या सौंदर्यांत भर पडली आहे. अलिबागचे हेच निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी अलिबागमध्ये येत असतात. तसेच समुद्राचा आनंद लुटतात. मात्र आता अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘वॉर ट्रॉफी’ म्हणून बोलले जाणारा रणगाडा बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता पर्यटनवाढीला चालना मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.

रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार - पाटीलअनेक युद्धे गाजवणारा हा रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कल्पना मांडली आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर आज त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने माॅडेल म्हणून ओळखले जाणार आहे, असे आमदार जयंत पाटील यांनी भाषणात सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग