शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

राजनाला कालव्याला सोडले पाणी

By admin | Updated: December 21, 2015 01:31 IST

तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले

कर्जत : तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले जात नव्हते. यावेळी मुदतीत झीरो बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात राजनाला कालवा परिसरात भाताचे पीक घेतले जाईल अशी अपेक्षा आहे. पाणी पोटल कालव्याचे दुरु स्तीचे काम वनविभागामुळे अर्धवट असल्याने त्या भागात पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. १९६० च्या दशकात राजनाला कालवा तयार करण्यात आला, त्यावेळी २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येत होती. १९९० च्या दशकात शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार शेती करण्याचे सोडून दिले होते. त्यातच राजनाला कालव्याची दुरु स्ती करण्याची तरतूद पाटबंधारे खात्याकडे नसल्याने शेतकरी कालव्यात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साफकरून शेतीसाठी पाणी घेत. मात्र अनेक ठिकाणी कालवा, पोटकालवे फुटून तर त्यांना मोठ्या खांडी पडून लावलेल्या शेतीचे नुकसान होत असे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०११ मध्ये राजनाला कालव्याच्या दुरु स्तीचा आणलेला प्रस्ताव मान्य करीत एक वर्षासाठी शेती न करता कालव्याच्या दुरु स्तीला परवानगी दिली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी कालव्याचे काम पूर्ण होत नसल्याने शेतकरी दुबार शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आक्र मक झाले.यावर्षी राजनाला भागातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आग्रह होता. त्यासाठी शेतकरी समितीच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नाना गांगल, तानाजी चव्हाण, शिवाजी देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे राजनाला कालव्यात पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे १७ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या भिवपुरी येथील झीरो बंधारा येथे पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)