शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

राजनाला कालव्याला सोडले पाणी

By admin | Updated: December 21, 2015 01:31 IST

तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले

कर्जत : तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले जात नव्हते. यावेळी मुदतीत झीरो बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात राजनाला कालवा परिसरात भाताचे पीक घेतले जाईल अशी अपेक्षा आहे. पाणी पोटल कालव्याचे दुरु स्तीचे काम वनविभागामुळे अर्धवट असल्याने त्या भागात पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. १९६० च्या दशकात राजनाला कालवा तयार करण्यात आला, त्यावेळी २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येत होती. १९९० च्या दशकात शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार शेती करण्याचे सोडून दिले होते. त्यातच राजनाला कालव्याची दुरु स्ती करण्याची तरतूद पाटबंधारे खात्याकडे नसल्याने शेतकरी कालव्यात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साफकरून शेतीसाठी पाणी घेत. मात्र अनेक ठिकाणी कालवा, पोटकालवे फुटून तर त्यांना मोठ्या खांडी पडून लावलेल्या शेतीचे नुकसान होत असे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०११ मध्ये राजनाला कालव्याच्या दुरु स्तीचा आणलेला प्रस्ताव मान्य करीत एक वर्षासाठी शेती न करता कालव्याच्या दुरु स्तीला परवानगी दिली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी कालव्याचे काम पूर्ण होत नसल्याने शेतकरी दुबार शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आक्र मक झाले.यावर्षी राजनाला भागातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आग्रह होता. त्यासाठी शेतकरी समितीच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नाना गांगल, तानाजी चव्हाण, शिवाजी देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे राजनाला कालव्यात पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे १७ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या भिवपुरी येथील झीरो बंधारा येथे पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)