शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

राजनाला कालव्याला सोडले पाणी

By admin | Updated: December 21, 2015 01:31 IST

तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले

कर्जत : तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले जात नव्हते. यावेळी मुदतीत झीरो बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात राजनाला कालवा परिसरात भाताचे पीक घेतले जाईल अशी अपेक्षा आहे. पाणी पोटल कालव्याचे दुरु स्तीचे काम वनविभागामुळे अर्धवट असल्याने त्या भागात पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. १९६० च्या दशकात राजनाला कालवा तयार करण्यात आला, त्यावेळी २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येत होती. १९९० च्या दशकात शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार शेती करण्याचे सोडून दिले होते. त्यातच राजनाला कालव्याची दुरु स्ती करण्याची तरतूद पाटबंधारे खात्याकडे नसल्याने शेतकरी कालव्यात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साफकरून शेतीसाठी पाणी घेत. मात्र अनेक ठिकाणी कालवा, पोटकालवे फुटून तर त्यांना मोठ्या खांडी पडून लावलेल्या शेतीचे नुकसान होत असे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०११ मध्ये राजनाला कालव्याच्या दुरु स्तीचा आणलेला प्रस्ताव मान्य करीत एक वर्षासाठी शेती न करता कालव्याच्या दुरु स्तीला परवानगी दिली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी कालव्याचे काम पूर्ण होत नसल्याने शेतकरी दुबार शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आक्र मक झाले.यावर्षी राजनाला भागातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आग्रह होता. त्यासाठी शेतकरी समितीच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नाना गांगल, तानाजी चव्हाण, शिवाजी देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे राजनाला कालव्यात पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे १७ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या भिवपुरी येथील झीरो बंधारा येथे पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)