शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राजनाला कालव्याला सोडले पाणी

By admin | Updated: December 21, 2015 01:31 IST

तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले

कर्जत : तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले जात नव्हते. यावेळी मुदतीत झीरो बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात राजनाला कालवा परिसरात भाताचे पीक घेतले जाईल अशी अपेक्षा आहे. पाणी पोटल कालव्याचे दुरु स्तीचे काम वनविभागामुळे अर्धवट असल्याने त्या भागात पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. १९६० च्या दशकात राजनाला कालवा तयार करण्यात आला, त्यावेळी २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येत होती. १९९० च्या दशकात शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार शेती करण्याचे सोडून दिले होते. त्यातच राजनाला कालव्याची दुरु स्ती करण्याची तरतूद पाटबंधारे खात्याकडे नसल्याने शेतकरी कालव्यात पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा साफकरून शेतीसाठी पाणी घेत. मात्र अनेक ठिकाणी कालवा, पोटकालवे फुटून तर त्यांना मोठ्या खांडी पडून लावलेल्या शेतीचे नुकसान होत असे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने २०११ मध्ये राजनाला कालव्याच्या दुरु स्तीचा आणलेला प्रस्ताव मान्य करीत एक वर्षासाठी शेती न करता कालव्याच्या दुरु स्तीला परवानगी दिली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी कालव्याचे काम पूर्ण होत नसल्याने शेतकरी दुबार शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आक्र मक झाले.यावर्षी राजनाला भागातील सर्व गावातील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आग्रह होता. त्यासाठी शेतकरी समितीच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नाना गांगल, तानाजी चव्हाण, शिवाजी देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे राजनाला कालव्यात पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे १७ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या भिवपुरी येथील झीरो बंधारा येथे पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)