शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात पेरण्या पूर्ण

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली

जयंत धुळप, अलिबागयंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. रायगड जिल्ह्यात पावसाला नेहमीपेक्षा उशीर झाला असला तरी प्रारंभाच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असून, समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक नक्षत्र आणि पावसाच्या समन्वयाच्या अभ्यासानुसार सध्याचा पाऊस टिकणारा असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणच्या पेरण्या झाल्या, तेथे भाताची उगवण चांगली व दमदार झाली असल्याची माहिती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पीक लागवड होणार आहे. यापैकी १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नागली, १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर कडधान्ये तर ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण १७ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी १५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यास पोहोच होवून त्यापैकी ७० टक्के बियाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांस आवश्यक पीक कर्ज सत्वर उपलब्ध करुन देण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष नियोजन केले आहे तर त्याच सोबत राष्ट्रीय तसेच खासगी बँकांच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यातील ३४ हजार १४५ शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी सन २०१६-१६च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना १५८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते.