शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात पेरण्या पूर्ण

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली

जयंत धुळप, अलिबागयंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. रायगड जिल्ह्यात पावसाला नेहमीपेक्षा उशीर झाला असला तरी प्रारंभाच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असून, समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक नक्षत्र आणि पावसाच्या समन्वयाच्या अभ्यासानुसार सध्याचा पाऊस टिकणारा असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणच्या पेरण्या झाल्या, तेथे भाताची उगवण चांगली व दमदार झाली असल्याची माहिती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पीक लागवड होणार आहे. यापैकी १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नागली, १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर कडधान्ये तर ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण १७ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी १५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यास पोहोच होवून त्यापैकी ७० टक्के बियाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांस आवश्यक पीक कर्ज सत्वर उपलब्ध करुन देण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष नियोजन केले आहे तर त्याच सोबत राष्ट्रीय तसेच खासगी बँकांच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यातील ३४ हजार १४५ शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी सन २०१६-१६च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना १५८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते.