शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात पेरण्या पूर्ण

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली

जयंत धुळप, अलिबागयंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. रायगड जिल्ह्यात पावसाला नेहमीपेक्षा उशीर झाला असला तरी प्रारंभाच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असून, समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक नक्षत्र आणि पावसाच्या समन्वयाच्या अभ्यासानुसार सध्याचा पाऊस टिकणारा असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणच्या पेरण्या झाल्या, तेथे भाताची उगवण चांगली व दमदार झाली असल्याची माहिती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पीक लागवड होणार आहे. यापैकी १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नागली, १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर कडधान्ये तर ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण १७ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी १५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यास पोहोच होवून त्यापैकी ७० टक्के बियाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांस आवश्यक पीक कर्ज सत्वर उपलब्ध करुन देण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष नियोजन केले आहे तर त्याच सोबत राष्ट्रीय तसेच खासगी बँकांच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यातील ३४ हजार १४५ शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी सन २०१६-१६च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना १५८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते.