शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाड तालुक्यात वादळी पाऊस, ग्रामीण भागातील घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:01 IST

गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला.

बिरवाडी : गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांचे नुकसान झाले तर भात शेतीवर या वादळाचा परिणाम होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.महाड तालुक्यामध्ये मागील दोन-तीन दिवस सायंकाळी कोसळणाºया पावसामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होत असताना सोमवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.कोतुर्डे गावातील प्रकाश ठोंबरे यांच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले, तर वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सवाद, धारवली या गावांमध्ये पाच विजेचे खांब कोसळल्याने गेले चार दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून तातडीने विजेचे खांब बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.औद्योगिक वसाहतीसह जीते, धामणे, टेमघर, आसनपोई, वाघोली, पाने, पंदेरी, कोंझर, नाते, नांदगाव या काही गावांना देखील वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.तालुक्यामध्ये भाताचे पीक समाधानकारक असले तरी अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त के ली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड